शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘मानिनी’चे दप्तरच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:01 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भुदरगड नागरी पतसंस्थेनंतर जिल्ह्णात ठेवीदारांना सर्वाधिक त्रास देणाºया पतसंस्थांच्या यादीत ‘तपोवन’ व ‘मानिनी’ या संस्थांचा क्रमांक वरचा आहे. ‘मानिनी’चे मूळ दप्तरच गायब आहे. ठेवीदारांची संख्या किती, हीच माहिती अवसायकांकडे नसल्याने ठेवी मिळणे दूरच राहिले आहे. या संस्थांचे कर्जदार निवांत आहेत; मात्र ठेवीदारांवर उपासमारीची वेळ ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भुदरगड नागरी पतसंस्थेनंतर जिल्ह्णात ठेवीदारांना सर्वाधिक त्रास देणाºया पतसंस्थांच्या यादीत ‘तपोवन’ व ‘मानिनी’ या संस्थांचा क्रमांक वरचा आहे. ‘मानिनी’चे मूळ दप्तरच गायब आहे. ठेवीदारांची संख्या किती, हीच माहिती अवसायकांकडे नसल्याने ठेवी मिळणे दूरच राहिले आहे. या संस्थांचे कर्जदार निवांत आहेत; मात्र ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली असताना सहकार विभागाचे हातावर हात आहेत.जिल्हा कार्यक्षेत्र असणाºया तपोवन पतसंस्थेचे सोळा शाखांच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. ग्राहकांनी मोठ्या विश्वासाने पतसंस्थेत ठेवी ठेवल्या; पण संचालक मंडळाच्या कारनाम्यांमुळे संस्था अडचणीत आली आणि आॅगस्ट २०१६ मध्ये संस्था अवसायनात काढली. त्यावेळी २ हजार ७४८ कर्जदारांकडे ९ कोटी ५० लाखांची कर्जे थकीत होती; तर ६ हजार ५३९ ठेवीदारांच्या आठ कोटींच्या ठेवी देय होत्या. संस्था अडचणीत आल्याने ठेवीदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केली; पण त्यांना पैसे मिळाले नाहीत.अनेक ठेवीदारांनी ठेव, ठेव म्हणून तळमळून जीव सोडला; तर अनेकजण अंथरुणावर पडून आहेत; पण औषधोपचारांसाठी पैसे नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. मध्यंतरी राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी ‘तपोवन’ला २ कोटी ७९ लाखांचे पॅकेज दिले. अजून सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या ठेवींचे वाटप व्हायचे आहे. वसुली अधिकारी नसल्याने गेले नऊ महिने वसुलीचे कामकाज ठप्प आहे.‘मानिनी’च्या संचालकांचे कारनामे साºया महाराष्टÑात गाजले. मुलांचे लग्नकार्य, शिक्षणासाठी जमविलेली पुंजी मिळत नसल्याने ठेवीदार अक्षरश: तडफडत आहेत. अवसायकांकडे पतसंस्थेचे मूळ दप्तरच नाही; त्यामुळे ठेवी परत द्यायच्या लांबच; पण ठेवीदारांची संख्या कितीही हेच माहिती नाही. जो मागायला येतो, तोच ठेवीदार गृहीत धरायचा असाच प्रकार सध्या सुरू आहे. ‘भुदरगड’, ‘तपोवन’ व ‘मानिनी’प्रमाणे अजूनही ‘बाबूराव महाजन’, ‘राजीव नागरी’ सारख्या डझनभर पतसंस्थांनी ठेवीदारांच्या गळ्याला फास लावला आहे. याबाबत वेळकाढूपणाची कार्यवाही बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सहकार विभाग लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. (उत्तरार्ध)उच्चभ्रूंची संस्था तरीही..मानिनी महिला पतसंस्थेत सर्व संचालकांबरोबर एकूणच प्रशासन उच्चभ्रू होते. त्यामुळे संस्था बुडणार नाही, असा विश्वास सामान्य ठेवीदाराला होता. त्यामुळेच मोलमजुरी करून सर्वसामान्यांनी पोटाला चिमटा देऊन जमलेले पैसे पतसंस्थेत ठेवले; पण त्यांनीही रंग दाखविल्याने सहकारावरील उरलासुरला विश्वासही उडाला आहे.कलम ‘८८’ची कारवाई रद्द होतेच कशी?‘मानिनी’वर कलम ८८ नुसार साडेपाच कोटींची जबाबदारी संचालकांवर निश्चित केली होती; पण तत्कालीन विभागीय सहनिबंधकांनी ती रद्द ठरविली. ‘तपोवन’चीही दोन वेळा झालेली कलम ‘८८’ची कारवाई रद्द ठरविली. सहकार विभागच अशा संचालकांना पाठीशी घालणार असेल, तर ठेवीदारांनी न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.