शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

पन्हाळा-शाहूवाडीत श्रेयवादाचे राजकारण : विकासकामांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:28 IST

नितीन भगवान ।पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणा त सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आहे, पण ही कामं नेमकी कुणामुळे आलीत याबाबत टोकाचे मतभेद आहेत.या दोन्ही तालुक्यांत अजूनही रस्ते, पाणी, ...

ठळक मुद्देकामांची मंजुरीची पत्रे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमांचा धडाकाकामे नेमकी कुणी केली याबाबत संभ्रम

नितीन भगवान ।पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणात सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आहे, पण ही कामं नेमकी कुणामुळे आलीत याबाबत टोकाचे मतभेद आहेत.

या दोन्ही तालुक्यांत अजूनही रस्ते, पाणी, वीज यांच्याच समस्या प्रतीवर्षी भेडसावत आहेत. मी हा रस्ता केला. तेथे पाणी योजना आणली. त्या ठिकाणी वीज जोडली, हे आजी-माजी लोकप्रतिनिधी भाषणबाजी करताना सांगत आहेत, पण बहुतेक लोकांचे म्हणणे या तर मूलभूत गरजाच आहेत. मग हा विकास म्हणू शकतोे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी रस्त्यांची अनेक कामे आपण मंजूर करून आणल्याचे सांगून संबंधित गावात त्या कामांची मंजुरीची पत्रे सुपूर्द करण्याचा कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. शिवसेना राज्यात सत्तेत असून नसल्यासारखी आहे. कारण भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस सरकारला अपशकुन करण्याची एकही संधी शिवसेनेने गेल्या चार वर्षांत सोडलेली नाही. केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपप्रणीत सरकारला कुचकामी ठरवण्याची शिवसेनेला विरोधी पक्षांपेक्षा अधिक घाई झाली आहे. युतीतला भागीदार पक्ष म्हणून चांगल्या कामांचे श्रेय घेण्याचा पूर्ण अधिकार शिवसेनेला आहे, पण सरकारविरोधात ज्या मुद्द्यांवर लोकांमध्ये नाराजी आहे, त्याची जबाबदारी मात्र शिवसेनेला घ्यायची नाही. किंबहुना हे सरकार कसे अपयशी आहे, हे सांगण्यास शिवसेना विरोधकांच्या नेहमीच दोन पावले पुढे असते. त्यामुळे या सरकारने काम केलेय का नाही, ते एकदा शिवसेनेला ठरवावे लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला राज्यातल्या भाजपप्रणीत आघाडी सरकारशी जवळीक असलेले माजी मंत्री विनय कोरे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटातूनही ही कामे सरकारच्या माध्यमातून केली आहेत, असे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या संबंधातल्या पोस्ट त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर याबाबत समर्थकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. चौकाचौकांत सुरू असलेल्या डिजिटल बोर्डसमुळे जनता हैराण झाली आहे. त्यात वर्तमानपत्रात परस्परविरोधी बातम्या छापून येत असल्याने लोकांना काही कळेनासे झाले आहे. आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

आगामी निवडणुकात भाजप आणि शिवसेनेची युती होण्याच्या शक्यतेबाबत एकमत होणे कठीणही नाही आणि सोपे पण नाही. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये सहभागी असलेलेच पक्ष एकमेकांसमोर असतील आणि जी काही विकासकामे झालीत किंवा मंजूर झालीत, ती आपल्यामुळेच झालीत, असे दावे दोन्ही पक्षांकडून होतील. त्यामुळे कामे नेमकी कुणी केलीत, याचा निर्णय जनतेला मतपेटीतून द्यावा लागणार आहे, पण सध्यातरी श्रेयवादाची स्पर्धा एवढी पराकोटीला गेली आहे की, एकाच विकासकामांची दोन दोन उद्घाटने झाली नाहीत म्हणजे मिळविली, अशी स्थिती शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यांत आहे.‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं’सोशल मीडियाच्या आगमनानंतर लोकांत पण आता जनजागृती जोरदार होऊ लागली आहे. गटातटाचे राजकारण एका बाजूला सुरू असले तरी लोकांना आता दर्जेदार कामे पाहिजे आहेत. निवडणुकीच्या राजकारणाचं अर्थकारण सांभाळताना विकासकामात पूर्वांपार चालत आलेल्या खाबूगिरीला आता चाप लावावा लागणार आहे. कामाचा दर्जा घसरला तर त्याचा जाब जनता निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. विकासाचा सूर्य कुणामुळे का उगवला असेना, आता विकासकामावर होणाºया कोट्यवधीच्या खर्चातून जास्तीत जास्त दर्जेदार कामे झाली तरच खºया अर्थाने शाहूवाडी-पन्हाळ्यात विकासाचा सूर्य उगवला असे म्हणता येईल, अन्यथा ‘ये पब्लिक हंै, सब जानती हंै’, हे सर्वच राजकारणी मंडळींनी लक्षात घेतलेले बरे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर