शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देपूरस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज : पोलीस अधीक्षक ५० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

कोल्हापूर : जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आहे. गरज भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला हे प्रशिक्षित पोलीस मदत करणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.गतवर्षी आंबेवाडी, चिखली, वडणगे या गावांसह शहरातील नागाळा पार्क, बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, लक्षतीर्थ, कसबा बावडा, आदी भागांना महापुराचा मोठा फटका बसला. महापुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुस्थळी स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस यंत्रणा आणि सेवाभावी संघटनांनी मोठे योगदान दिले.

त्यावेळी पुराच्या पाण्यातून बोटीने मार्ग काढत जाताना पाण्याचा प्रवाह, पाण्याखालील गावांचा भाग, विद्युत खांब, झाडी, मोठ्या इमारती यांची माहिती पोलिसांना नव्हती. त्यातच बोट चालविण्याचे कौशल्य नसल्याने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागले.

परजिल्ह्यांतून बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्त गावांच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नव्हती; पण तशी आपत्कालीन परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास अडचण येऊ नये, ही उणीव ओळखून जिल्हा पोलीस दलातील व पूरग्रस्त क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या आपत्ती व्यवस्थापनात पूरपरिस्थितीत अडकणारी संभाव्य गावे, त्यांची भौगोलिक रचना, मदतीसाठी तेथे जाण्याचे व परतण्याचे मार्ग, महापुरात बोट चालविण्याचे कौशल्य, पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्यासह जवळपास ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले आहे.सध्या पावसाचा जोर वाढला असून धरणांतूनही पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्कालीन स्थितीत कोणत्याही क्षणी आवश्यकता वाटल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरPoliceपोलिस