शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Kolhapur: पोलिस भरती एका गुणाने हुकली; नैराश्यातून तरुणाने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 12:00 IST

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ...

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ता. करवीर) याने तणनाशकाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. पोलिस भरतीचे उद्दिष्ट ठेवलेला जयेंद्र अपयशाने नैराश्यात होता. मंगळवारी (दि. १४) त्याने राहत्या घरात इंजेक्शन घेतले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १६) सकाळी त्याचा मृत्यू झाला. जीव वाचला असता तर आणखी दहा परीक्षा देता आल्या असत्या; परंतु तसा विचारच न केल्याने एक उमदे आयुष्य उमलता उमलता कोमेजून गेले. हाताशी आलेल्या मुलाने अशा पद्धतीने जीवन संपवल्याने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.सडोली दुमाला येथील जयेंद्र पाटील याने पदवीचे शिक्षण घेतले होते. गेल्या सहा वर्षांपासून तो पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. गेल्यावर्षी झालेल्या भरती प्रक्रियेत अवघ्या एका गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर तो नैराश्यात होता. मित्र आणि नातेवाइकांनी अनेकदा त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नैराश्यातून बाहेर आला नाही. मंगळवारी सकाळी त्याने दंडात तणनाशकाचे इंजेक्शन टोचून घेतले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपयशातून टोकाचा निर्णय घेतल्याने त्याचे कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला. जयेंद्र याच्या पश्चात आई, वडील, बहीण, चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू