शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 13:10 IST

Police Kolhapur : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका कमी बुध्यांक असलेल्या पश्चिम बंगालमधील मुलीला आला. त्या मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला फसवून कोल्हापुरात आणले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील कोळेकर यांनी प्रयत्न करून तिच्या वडिलांचा शोध लावला. सध्या ही मुलगी शासकीय वसतिगृहात असून लॉकडाऊन कमी झाल्यावर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा सुखद प्रत्यंतर , पोलिस अधीक्षकांनी केले प्रयत्न

कोल्हापूर : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका कमी बुध्यांक असलेल्या पश्चिम बंगालमधील मुलीला आला. त्या मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला फसवून कोल्हापुरात आणले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील कोळेकर यांनी प्रयत्न करून तिच्या वडिलांचा शोध लावला. सध्या ही मुलगी शासकीय वसतिगृहात असून लॉकडाऊन कमी झाल्यावर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.घडले ते असे : ही मुलगी सुमारे १८ वर्षांची आहे. ती फक्त पश्चिम बंगालमधील तिच्या गावाचे नाव सांगते. तिच्या घरी असिफ आलम नावाचा मुलगा येत होता. त्याच्याशी झालेल्या ओळखीतून ती त्याच्याबरोबर घरातून निघून आली. काही दिवस मुंबईत राहिली. तिथे त्यांने मारहाण करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतू तो या मुलीने उधळून लावला. त्या रागातून या मुलाने या मुलीस कोल्हापुरात आणले आणि सोडून तो पसार झाला.

काही दिवसांपूर्वी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती पोलिसांना मिळून आली. तिच्याशी संवाद साधल्यावर तिचा बुध्यांक कमी असल्याचे लक्षात आले. वयही निश्चित सांगता येत नव्हते. मतिमंद मुलांच्या शाळेत काम केलेल्या मुख्याध्यापिका स्वाती गोखले यांची मदत घेण्यात आली. त्यांनी सीपीआरकडून तिची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिचे वयही समजले.

सीपीआरच्या तपासणीत तिचा बुध्यांक कमी असल्याचे स्पष्ट झाले. तिने सांगितलेल्या गावाच्या माहितीवर ती पश्चिम बंगालमधील पुर्लिया जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले . त्यानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पश्चिम बंगाल पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधला व तिचे वडिल अन्वर इब्राहिम शेख यांचा शोध लागला.

मुलगी कोल्हापुरात असल्याचे समजल्यावर त्यांचाही जीव भांड्यात पडला. परंतू लॉकडाऊन असल्याने सध्या तिला न्यायला येता नसल्याने काही दिवसांसाठी या मुलीस शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. एका वाट चुकलेल्या मुलीला तिच्या वडिलांकडे सुपूर्द करणे हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे व त्यासाठीच सगळी धडपड केल्याची प्रतिक्रिया करवीरचे पोलिस निरीक्षक सुनिल कोळेकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरwest bengalपश्चिम बंगाल