शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

तत्काळ मदतीसाठी ‘डायल ११२’ हेल्पलाईन, मात्र नागरिकांच्या भलत्याच तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 13:26 IST

‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन.

तानाजी पोवार

कोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ‘११२’ नंबर डायल करा, अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतील. मात्र, फेक कॉल केल्यास गुन्हा दाखल होत असल्याने तसे फेक कॉल येत नसल्याचे या विभागातील पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले.

गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘डायल ११२’ ही नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली. याचे नियंत्रण हे नवी मुंबईतून होत आहे. चोवीस तास ही ‘हेल्पलाईन’ सेवा सुरु आहे. ज्या भागातून फोन आला, त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाला नवी मुंबईतून फोन जाऊन घटनास्थळाचे लोकेशन दिले जाते. त्या परिसरातील पोलिसांच्या बीट मार्शल व्हॅनला संदेश मिळताच तातडीने ती मदतीसाठी घटनास्थळी पोहोचते.

दोन महिन्यात १६८० कॉल

ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत ‘डायल ११२’ या हेल्पलाईनला कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल १,६८० कॉल आले. यानंतर मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने अनेक अनुचित घटना टाळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या कार्यशैलीची प्रतिमा उंचावण्यास यामुळे मदत मिळत आहे.

फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हा

फेक कॉल करुन पोलिसांची दिशाभूल अथवा त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होणार आहे. हा फेक कॉल करणारा कोण आणि त्याने तो कोठून केला, याचे लोकेशन समजणार आहे. त्यामुळे तातडीने त्याच्यावर कारवाई करता येणार आहे. अद्याप तरी ‘११२’ला गंमत म्हणून फेक कॉल करणाऱ्यांचे कॉल नंबर ब्लॉक केले जात आहेत. त्यामुळे अद्याप जिल्ह्यात तरी फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत.

बायको भांडतेय, यासाठी कशाला हवी मदत?

‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन. त्यामुळे या हेल्पलाईनला विनाकारण फोन करुन त्रास देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

तत्काळ मदतीसाठी ४२६ जणांची फौज

जिल्ह्यात ११२वर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक जयसिंह रिसवडकर या अधिकाऱ्यांसह ४२६ पोलिसांची फौज आहे. त्याशिवाय तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यासाठी ४० चारचाकी व ४६ दुचाकी कार्यरत आहेत. महेंद्र कंपनीचे अभियंते अमोल चौगुले, अरुण कांबळे हे तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.

‘ही सेवा गंभीर घटनेत तत्काळ मदत करण्यासाठी आहे. त्यासाठी २४ तास पोलीस यंत्रणा सक्रिय आहे. निव्वळ गंमत म्हणून फेक कॉल करुन पोलिसांचा वेळ घालविणाऱ्यांना ते महागात पडणार आहे.’ - जयसिंह रिसवडकर, प्र. पोलीस निरीक्षक, ‘डायल ११२’.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस