शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

तत्काळ मदतीसाठी ‘डायल ११२’ हेल्पलाईन, मात्र नागरिकांच्या भलत्याच तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 13:26 IST

‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन.

तानाजी पोवार

कोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ‘११२’ नंबर डायल करा, अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतील. मात्र, फेक कॉल केल्यास गुन्हा दाखल होत असल्याने तसे फेक कॉल येत नसल्याचे या विभागातील पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले.

गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘डायल ११२’ ही नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली. याचे नियंत्रण हे नवी मुंबईतून होत आहे. चोवीस तास ही ‘हेल्पलाईन’ सेवा सुरु आहे. ज्या भागातून फोन आला, त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाला नवी मुंबईतून फोन जाऊन घटनास्थळाचे लोकेशन दिले जाते. त्या परिसरातील पोलिसांच्या बीट मार्शल व्हॅनला संदेश मिळताच तातडीने ती मदतीसाठी घटनास्थळी पोहोचते.

दोन महिन्यात १६८० कॉल

ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत ‘डायल ११२’ या हेल्पलाईनला कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल १,६८० कॉल आले. यानंतर मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने अनेक अनुचित घटना टाळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या कार्यशैलीची प्रतिमा उंचावण्यास यामुळे मदत मिळत आहे.

फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हा

फेक कॉल करुन पोलिसांची दिशाभूल अथवा त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होणार आहे. हा फेक कॉल करणारा कोण आणि त्याने तो कोठून केला, याचे लोकेशन समजणार आहे. त्यामुळे तातडीने त्याच्यावर कारवाई करता येणार आहे. अद्याप तरी ‘११२’ला गंमत म्हणून फेक कॉल करणाऱ्यांचे कॉल नंबर ब्लॉक केले जात आहेत. त्यामुळे अद्याप जिल्ह्यात तरी फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत.

बायको भांडतेय, यासाठी कशाला हवी मदत?

‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन. त्यामुळे या हेल्पलाईनला विनाकारण फोन करुन त्रास देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

तत्काळ मदतीसाठी ४२६ जणांची फौज

जिल्ह्यात ११२वर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक जयसिंह रिसवडकर या अधिकाऱ्यांसह ४२६ पोलिसांची फौज आहे. त्याशिवाय तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यासाठी ४० चारचाकी व ४६ दुचाकी कार्यरत आहेत. महेंद्र कंपनीचे अभियंते अमोल चौगुले, अरुण कांबळे हे तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.

‘ही सेवा गंभीर घटनेत तत्काळ मदत करण्यासाठी आहे. त्यासाठी २४ तास पोलीस यंत्रणा सक्रिय आहे. निव्वळ गंमत म्हणून फेक कॉल करुन पोलिसांचा वेळ घालविणाऱ्यांना ते महागात पडणार आहे.’ - जयसिंह रिसवडकर, प्र. पोलीस निरीक्षक, ‘डायल ११२’.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस