शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पोलिसांवरील हल्ला पडला महाग--माजी उपमहापौर यांच्यासह ४० जणांना लागणार मोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:03 IST

शहरातील यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात कायद्याने या सर्वांच्या आणखीनच चांगल्या मुसक्या आवळल्या आहेत.

ठळक मुद्देपोलिस अधिक्षकांनी विशेष पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविला प्रस्ताव--अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांना आली जाग...सायंकाळपर्यंत मंजूरी मिळण्याचा विश्वास -शमा मुल्लासह २० जणांना पोलीस कोठडी मटका बुकींगवाल्यांचा पोलिसांवरील हल्ला पडला महाग,  माजी उपमहापौर यांच्यासह ४० जणांना लागणार मोका  , खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल

कोल्हापूर : शहरातील यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात कायद्याने या सर्वांच्या आणखीनच चांगल्या मुसक्या आवळल्या आहेत.  आज सकाळी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी विशेष पोलीस महासंचालक संदीप वारके यांच्याकडे तत्काळ या सर्वांना मोका लावण्यासाठी प्रस्ताव मंजूरीला पाठविला आहे. यावर सायंकाळी सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास देशमुख यांनी पत्रकारांना दिला आहे. पोलीस महासंचालक यांनीही अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

 पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज आणखी चौघांना अटक करण्यात आली त्यात निलेश दिलीप काळे राजू येशील सुंदर रावसाहेब दाभाडे व जावेद मुल्ला यांचा समावेश आहे त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या पंचवीस झाले आहे मुख्य संशयित निलेश काळे याने वरिष्ठ अधिकारी शर्मा यांचे सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्यावर हल्ला करून सर्विस रिवाल्वर पळवून नेले होते लक्षतीर्थ वसाहत जवळ चौघांना शेतात पाटलाकडून पकडले असेही पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांनी सांगितले यावेळी यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते

  या हल्ला प्रकरणातील सर्व संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मटकाचालक सलीम यासिन मुल्ला पिस्तूल घेऊन आपल्या साथीदारांसह पसार झाला होता. पोलिसांवर झालेल्या या हल्ल्याची पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे, अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये सुमारे ५० जणांचा समावेश आहे. पोलिसांनी १८ पानी पंचनामा तयार केला आहे. जास्तीतजास्त पुरावे गोळा करीत अधिक साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत. 

प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शर्मा यांचाही जबाब घेतला आहे. हल्ल्यामध्ये शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील हा जखमी झाला आहे.  मंगळवारी दिवसभर संशयितांची धरपकड सुरूहोती. अजूनही तपास वेगाने केला जात असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक वाढावा व कायद्याची ताकद समजावी यासाठी आता पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात संबंधित संशयित गुन्हेगारांवर काय कारवाई होणार हा चर्चेचा विषय बनला होता. 

अटक झालेल्यांची नावे माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला (वय ४२), तौफिक सद्दाक शिकलगार (३८, रा. सदर बझार), फिरोज खलील मुजावर (५७), शाहरुख रफीक लाड (वय २४), जावेद शौकत नाचरे (२१), अजय बाळासाहेब कांबळे (वय ४७), शाहरुख रफीक लाड (२४) , उमेर मुजाहिद मोमीन (२०) साहिल नियाज मुजावर (२०), ओंकार रवींद्र पारीसवाडकर (३३), आकाश लक्ष्मण पोवार (१८),रोहित बाळू गायकवाड (४५), टिपू मुल्ला (३०), सुनिल दाभाडे (३५), सज्जाद ईसाक नाईकवडी (५२, सर्व, रा. यादवनगर), दिलीप वामन कवडे (४०, रा. सदर बझार), विजय मारूती सांगावकर (४३, रा. शाहूनगर), अरिफ रफिक शेख (२४, रा. बीडी कामगार वसाहत), जमीर साहेबजी मुल्ला (२८, रा. राजारामपुरी, माउली पुतळा), श्रीधर शिवाजी कांबळे (२३), साहिल आमिन नदाफ (२४), मुश्रीफ पठाण (२१), इमाम आदम शेख (४०, सर्व रा. शास्त्रीनगर), रोहित बाळू गायकवाड (४५) बुधवारी अनेक वृत्तपत्रांनी पोलिसांची गुन्हेगारावरील सुटत चाललेली पकड व पोलिसांच्या आशिर्वादानेच सुरु असलेले हे अवैध धंदे तसेच आता थेट पोलीसच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हल्ला करण्याचे त्यांचे वाढलेले धाडस यावर चांगलेच ताशेरे ओढल्याने संपूर्ण पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाली आहे. सर्वसामान्यांना कायदा   व गुन्हेगारांना अभय असाच प्रकार अनेक पोलीस ठाण्यातून सुरु असल्याचे खुलेआम नागरिक बोलत होते. अनेक तक्रारी करूनही अवैध धंदे सुरुच होते. शहरात अजूनही अनेक ठिकाणी विविध अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा घेतलेला मोका कायद्याचा आधार कितपत यशस्वी होतोय हे महत्वाचे आहे.  पोलिसांनी आपला कायदा सक्षम राबवावा अशीच जनतेतून मागणी आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस