शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मतदानावेळी केली पोलिसास मारहाण; कोल्हापुरात सरपंचासह तिघांना सहा महिने कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 11:39 IST

मतदान केंद्रावरुन हटकल्याच्या रागातून पोलिसास मारहाण केली होती

कोल्हापूर : कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्रावर लुडबुड करणाऱ्या सरपंचास बंदोबस्तावरील पोलिसाने हटकले होते. त्या रागातून पोलिसास मारहाण करणाऱ्या सरपंचासह तिघांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी दोष ठरवून सहा महिने सश्रम कारावास आणि साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी (दि. १२) सुनावली.तत्कालीन सरपंच विष्णू गणपती पाटील (वय ६१), अमर मारुती गडकरी (३७) आणि धनाजी महिपती साबळे (३०, तिघे रा. कुशिरे तर्फ ठाणे) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान तत्कालीन सरपंच विष्णू पाटील हे मतदान केंद्रावर वारंवार लुडबुड करीत होते.

याबाबत बंदोबस्तावरील कॉन्स्टेबल अजित विश्वास शिपुगडे यांनी हटकले असता, पाटील यांच्यासह अमर गडकरी आणि धनाजी साबळे या तिघांनी कॉन्स्टेबल शिपुगडे यांना बेदम मारहाण केली. शिपुगडे यांच्या फिर्यादीनुसार कोडोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.न्यायालयात ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. काही साक्षीदार आणि निवडणूक कर्मचारी फितूर झाले. मात्र, फिर्यादींची साक्ष, वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी तिघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकCourtन्यायालयPoliceपोलिस