शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

PM Kisan चे आणखी ४३०० खातेदार अपात्र, दुसऱ्या हप्त्याला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:00 IST

PM Kisan Scheme : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते.

- राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ योजनेतील लाभार्थ्यांची कसून चौकशी महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजार खातेदार अपात्र ठरले होते. या चौकशीत आणखी ४ हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. संपूर्ण खात्यांची चौकशी करून १० जूनपर्यंत केंद्र सरकारकडे अहवाल पाठवायचा असल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते. त्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर सोपविणे गरजेचे होते. मात्र, महा ई-सेवा केंद्रांसह इतरांनी शेतकऱ्यांची माहिती भरल्याने मोठ्या प्रमाणात बोगस शेतकरी यादीत आले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गेले वर्षभर त्याची चौकशी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार खातेदार अपात्र ठरले. यामध्ये आयकर परतावा करणारे, सरकारी नोकरी असणाऱ्यांचा अधिक प्रमाणात समावेश होता. त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

अपात्र खातेदारांची सखोल चौकशी सुरू असून, आणखी चार हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. आठ हजार खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना आधार लिंक करण्याची सक्ती केली आहे. येत्या महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. अपात्र खातेदारांना नोटीस काढून लाभाची रक्कम परत करण्यासाठी विहित कालावधी द्यावा, त्या कालावधीत पैसे परत केले नाही, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना आहे.

आणेवारी असणारे अपात्र ठरणारज्यांच्या नावावर जमीन आहे, तेच पात्र ठरणार असून, आणेवारीत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्या लाभ घेत असलेल्यांमध्ये आणेवारीतील शेतकऱ्यांची संख्या कमी नाही.

चौकशीसाठी चाळण...पी. एम. किसान योजनेतील बोगसगिरीची थेट संसदेत चर्चा झाली होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या चौकशीसाठी महसूल यंत्रणेने अक्षरश: चाळण लावली आहे. लाभ घेतलेल्या बोगस खातेदारांकडून रक्कम तातडीने वसुली करा, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. जे अधिकारी वसूल करणार नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याने संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दुसऱ्या हप्त्याला विलंबसाधारणत: मे महिन्याच्या १ किंवा २ तारखेला पी. एम. किसानचा दुसरा हप्ता येतो. चौकशी सुरू आहे, त्यात एकाही अपात्र खातेदाराच्या नावावर पैसे जमा होणार नाहीत, याची दक्षता महसूल यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे हप्ता वर्ग होण्यास आणखी दहा दिवसांचा विलंब लागणार असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना