शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

PM Kisan चे आणखी ४३०० खातेदार अपात्र, दुसऱ्या हप्त्याला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:00 IST

PM Kisan Scheme : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते.

- राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ योजनेतील लाभार्थ्यांची कसून चौकशी महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजार खातेदार अपात्र ठरले होते. या चौकशीत आणखी ४ हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. संपूर्ण खात्यांची चौकशी करून १० जूनपर्यंत केंद्र सरकारकडे अहवाल पाठवायचा असल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते. त्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर सोपविणे गरजेचे होते. मात्र, महा ई-सेवा केंद्रांसह इतरांनी शेतकऱ्यांची माहिती भरल्याने मोठ्या प्रमाणात बोगस शेतकरी यादीत आले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गेले वर्षभर त्याची चौकशी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार खातेदार अपात्र ठरले. यामध्ये आयकर परतावा करणारे, सरकारी नोकरी असणाऱ्यांचा अधिक प्रमाणात समावेश होता. त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

अपात्र खातेदारांची सखोल चौकशी सुरू असून, आणखी चार हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. आठ हजार खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना आधार लिंक करण्याची सक्ती केली आहे. येत्या महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. अपात्र खातेदारांना नोटीस काढून लाभाची रक्कम परत करण्यासाठी विहित कालावधी द्यावा, त्या कालावधीत पैसे परत केले नाही, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना आहे.

आणेवारी असणारे अपात्र ठरणारज्यांच्या नावावर जमीन आहे, तेच पात्र ठरणार असून, आणेवारीत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्या लाभ घेत असलेल्यांमध्ये आणेवारीतील शेतकऱ्यांची संख्या कमी नाही.

चौकशीसाठी चाळण...पी. एम. किसान योजनेतील बोगसगिरीची थेट संसदेत चर्चा झाली होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या चौकशीसाठी महसूल यंत्रणेने अक्षरश: चाळण लावली आहे. लाभ घेतलेल्या बोगस खातेदारांकडून रक्कम तातडीने वसुली करा, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. जे अधिकारी वसूल करणार नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याने संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दुसऱ्या हप्त्याला विलंबसाधारणत: मे महिन्याच्या १ किंवा २ तारखेला पी. एम. किसानचा दुसरा हप्ता येतो. चौकशी सुरू आहे, त्यात एकाही अपात्र खातेदाराच्या नावावर पैसे जमा होणार नाहीत, याची दक्षता महसूल यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे हप्ता वर्ग होण्यास आणखी दहा दिवसांचा विलंब लागणार असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना