शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

गरजवंतांच्या पाठीवर प्रतिज्ञा नाट्यरंगचा हात! : मिळालेल्या रकमेतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:35 IST

पैशांअभावी कुणाचे उपचार थांबलेत, कुणाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, कुणाला शिक्षणाची आस आहे, कोणी वृद्धत्त्वात हलाखीचे जीवन कंठत आहे, पतीच्या निधनानंतर

ठळक मुद्देगेली १८ वर्षे व्रत

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : पैशांअभावी कुणाचे उपचार थांबलेत, कुणाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, कुणाला शिक्षणाची आस आहे, कोणी वृद्धत्त्वात हलाखीचे जीवन कंठत आहे, पतीच्या निधनानंतर अनेक माउली धुणंभांडी करून संसाराचा गाडा पेलताहेत, काहीजणांच्या आयुष्यामागे लागलेले दारिद्र्याचे शुक्लकाष्ठ संपतच नाही.. अशा अनेक गरजवंत महिलांसाठी प्रतिज्ञा नाट्यरंगने मदतीचा हात पुढे केला आहे.

गेल्या १८ वर्षांत दानशुरांनी दिलेल्या अगदी १00 रुपयांपासून सुरू होणारी मदत छोटी दिसत असली, तरी डोंगराहून मोठी झाली आहे...प्रशांत जोशी यांच्या प्रतिज्ञा नाट्यरंगने २००० सालापासून कलेतून सामाजिक कार्याचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थेच्या वतीने बालरंगभूमीसाठी विशेष काम केले जाते. नाटकाचे सादरीकरण करायचे आणि प्रेक्षकांना ऐच्छिक प्रवेश मूल्य ठेवायचे.

प्रेक्षक अगदी १0 रुपयांपासून शंभर-दोनशे रुपयांपर्यंत आपल्याला जमेल तेवढी रक्कम प्रवेशमूल्याच्या पेटीत टाकतात. याद्वारे वैद्यकीय, शिक्षण, अन्न-धान्य, दैनंदिन गरजा, कपडे, औषधपाणी अशा कोणत्याही स्वरूपाची गरज असूदे, प्रतिज्ञा नाट्यरंग ती पूर्ण करते. प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी, सतीश साळोखे, मदन काकडे यांच्यासह बाळासाहेब कदम, अमोद दंडगे, प्रवीण लिंबड, आम्रपाली क्षीरसागर, विवेक कमलाकर, ऐश्वर्या बेहेरे, डॉ. अंजली पाठक, डॉ. आनंद ढवळे, दिलीप अहुजा, नारायण इंदुरीकर, विवेक साबळे, अनिता पाटील, अमित टिकेकर, प्रफुल्ल गायकवाड अशा अनेक दानशुरांचे हात या सेवाव्रतात सहभागी आहेत.नवरात्रौत्सवापासून माणुसकीचा जागरहे सेवाभावी काम करत असताना शारदीय नवरात्रौत्सवात रोज एका गरजू महिलेला मदत करण्याचा संकल्प करण्यात आला. पहिल्या माळेला सुरू झालेला हा माणुसकीचा जागर आता दिवाळीपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. रोज जमा होईल तेवढी रक्कम कुटुंबाचा गाडा एकटीने ओढत असलेल्या अत्यंत गरजू व होतकरू महिलेला तिच्या घरी जाऊन दिली जाते. ही रक्कम एक हजार रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत आहे. नवरात्रौत्सवापासून आजपर्यंत २७ महिलांना हे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. 

गरजूंना मदत..गेल्या १८ वर्षांत प्रतिज्ञा नाट्यरंगने ३२५ गरजूंना मदत केली आहे. नाटक, गान मैफल, विविध व्यक्ती संस्थांचे नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून जवळपास १० लाखांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

सोशल मीडियाद्वारेही मदतप्रतिज्ञा नाट्यरंगच्या कामाची माहिती व रोज केले जाणारे अर्थसाहाय्य याची माहिती व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकसारख्या माध्यमातून व्हायरल होत आहे. गरजूची माहिती व दुरध्वनी क्रमांक त्यात दिलेला असतो, त्यामुळे मदत थेट गरजू महिलेपर्यंत पोहोचते; त्यामुळे सागर बगाडे यांच्या केवायफोरएच, आम्ही कोल्हापुरी, अशा विविध संस्था, ग्रुपनेही मदतीचा हात पुढे केला आहे.

टॅग्स :NatakनाटकMONEYपैसा