शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन  : जयंत पाटील : ३१ तारखेला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 20:05 IST

Jayant Patil Kolhapur flood meeting : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. याबाबत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन  : जयंत पाटील विभागातील अधिकाऱ्यांची ३१ तारखेला झूम बैठक

कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. याबाबत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.कोल्हापूर-सांगलीला २०१९ मध्ये महापुराचा फटका बसला होता. गेल्या वर्षीदेखील काही प्रमाणात नुकसान झाले. यंदादेखील पाऊस चांगला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा महापुरासारखी परिस्थिती येऊ नये यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबत त्यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, याच महिन्यात कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात मुख्य सचिव स्तरावर बैठक झाली आहे. त्यांनी कर्नाटकशी संपर्क ठेवला आहे. दोन्ही राज्यांच्या चर्चेतून व समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल.या विषयावर ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार आहे. यावेळी मांडल्या जाणाऱ्या सूचना अमलात आणल्या जातील.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूरSangliसांगलीfloodपूर