शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

बाजार समितीत भाजीपाल्याचा रात्रीच उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:00 IST

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे दोन महिने नियोजनबद्धरीत्या प्रयत्न सुरू आहेत. सौद्यावेळी सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होते, तेथील गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांनी रात्री अकरा ते अडीचपर्यंत भाजीपाल्याची खरेदी सुरू केली असून, रात्री व सकाळी अशा दोन टप्प्यांत खरेदी होत असल्याने गर्दी कमी करण्यात यश आले आहे.

रोज सुमारे ६०० खरेदीदार ६० टक्के (७०० क्विंटल) भाजीपाल्याची रात्री ‘मोघम’मध्येच खरेदी करतात, त्यातील शिल्लक कलम सकाळी सौद्यात लावून त्याचा दर काढला जात आहे. बाजार समितीत रोज स्थानिकासह सांगली व कर्नाटकातून भाजीपाला येतो. हा भाजीपाला कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाठविला जातो. भाजीपाला खरेदीसाठी रोज सौद्यात ११०० खरेदीदार भाग घेत असल्याने गर्दी होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, तरीही खरेदीदारांची संख्या आणि खरेदीची वेळ पाहता गर्दी रोखताना सगळ्यांचीच दमछाक होत आहे.

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

समितीची २४ तास यंत्रणा सक्रियरोज सायंकाळी सातपासूनच शेतकऱ्यांचा माल येण्यास सुरुवात होते. त्यानंतर अकरा वाजल्यापासून खरेदीदार येत असल्याने २४ तास सुरक्षा आणि वसुलीची यंत्रणा समितीने कार्यरत केली. त्यामुळे यंत्रणेवर ताण आहे.

सकाळी दहालाच मार्केट शांतएरवी दुपारी एकपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी असायची. मात्र, रात्रीची खरेदी सुरू झाल्यापासून सकाळी दहा वाजता सगळा माल संपल्याने एकदम शांतता जाणवते. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खरेदीदारांबरोबरच अडत्यांनीही प्रतिसाद दिला. मोघम जरी मालाची खरेदी होत असली तरी प्रत्येक कलमातील शिल्लक मालाचा सौदा काढणे बंधनकारक आहे.- मोहन सालपे , (सचिव, बाजार समिती)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड