शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

बाजार समितीत भाजीपाल्याचा रात्रीच उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:00 IST

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे दोन महिने नियोजनबद्धरीत्या प्रयत्न सुरू आहेत. सौद्यावेळी सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होते, तेथील गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांनी रात्री अकरा ते अडीचपर्यंत भाजीपाल्याची खरेदी सुरू केली असून, रात्री व सकाळी अशा दोन टप्प्यांत खरेदी होत असल्याने गर्दी कमी करण्यात यश आले आहे.

रोज सुमारे ६०० खरेदीदार ६० टक्के (७०० क्विंटल) भाजीपाल्याची रात्री ‘मोघम’मध्येच खरेदी करतात, त्यातील शिल्लक कलम सकाळी सौद्यात लावून त्याचा दर काढला जात आहे. बाजार समितीत रोज स्थानिकासह सांगली व कर्नाटकातून भाजीपाला येतो. हा भाजीपाला कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाठविला जातो. भाजीपाला खरेदीसाठी रोज सौद्यात ११०० खरेदीदार भाग घेत असल्याने गर्दी होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, तरीही खरेदीदारांची संख्या आणि खरेदीची वेळ पाहता गर्दी रोखताना सगळ्यांचीच दमछाक होत आहे.

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

समितीची २४ तास यंत्रणा सक्रियरोज सायंकाळी सातपासूनच शेतकऱ्यांचा माल येण्यास सुरुवात होते. त्यानंतर अकरा वाजल्यापासून खरेदीदार येत असल्याने २४ तास सुरक्षा आणि वसुलीची यंत्रणा समितीने कार्यरत केली. त्यामुळे यंत्रणेवर ताण आहे.

सकाळी दहालाच मार्केट शांतएरवी दुपारी एकपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी असायची. मात्र, रात्रीची खरेदी सुरू झाल्यापासून सकाळी दहा वाजता सगळा माल संपल्याने एकदम शांतता जाणवते. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खरेदीदारांबरोबरच अडत्यांनीही प्रतिसाद दिला. मोघम जरी मालाची खरेदी होत असली तरी प्रत्येक कलमातील शिल्लक मालाचा सौदा काढणे बंधनकारक आहे.- मोहन सालपे , (सचिव, बाजार समिती)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड