शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

बाजार समितीत भाजीपाल्याचा रात्रीच उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:00 IST

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे दोन महिने नियोजनबद्धरीत्या प्रयत्न सुरू आहेत. सौद्यावेळी सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होते, तेथील गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांनी रात्री अकरा ते अडीचपर्यंत भाजीपाल्याची खरेदी सुरू केली असून, रात्री व सकाळी अशा दोन टप्प्यांत खरेदी होत असल्याने गर्दी कमी करण्यात यश आले आहे.

रोज सुमारे ६०० खरेदीदार ६० टक्के (७०० क्विंटल) भाजीपाल्याची रात्री ‘मोघम’मध्येच खरेदी करतात, त्यातील शिल्लक कलम सकाळी सौद्यात लावून त्याचा दर काढला जात आहे. बाजार समितीत रोज स्थानिकासह सांगली व कर्नाटकातून भाजीपाला येतो. हा भाजीपाला कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाठविला जातो. भाजीपाला खरेदीसाठी रोज सौद्यात ११०० खरेदीदार भाग घेत असल्याने गर्दी होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, तरीही खरेदीदारांची संख्या आणि खरेदीची वेळ पाहता गर्दी रोखताना सगळ्यांचीच दमछाक होत आहे.

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

समितीची २४ तास यंत्रणा सक्रियरोज सायंकाळी सातपासूनच शेतकऱ्यांचा माल येण्यास सुरुवात होते. त्यानंतर अकरा वाजल्यापासून खरेदीदार येत असल्याने २४ तास सुरक्षा आणि वसुलीची यंत्रणा समितीने कार्यरत केली. त्यामुळे यंत्रणेवर ताण आहे.

सकाळी दहालाच मार्केट शांतएरवी दुपारी एकपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी असायची. मात्र, रात्रीची खरेदी सुरू झाल्यापासून सकाळी दहा वाजता सगळा माल संपल्याने एकदम शांतता जाणवते. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खरेदीदारांबरोबरच अडत्यांनीही प्रतिसाद दिला. मोघम जरी मालाची खरेदी होत असली तरी प्रत्येक कलमातील शिल्लक मालाचा सौदा काढणे बंधनकारक आहे.- मोहन सालपे , (सचिव, बाजार समिती)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड