शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Kolhapur :शारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:58 IST

Corona vaccine Kolhapur : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.

ठळक मुद्देशारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोलामागच्या दोन महिन्यांत लसीकरणात कोल्हापूर मागेच

कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई व अजित ठाणेकर यांनी लसीकरणावरून सुरू असलेल्या टीकेवरून दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात म्हटले आहे, लसीकरणाच्या विषयावर गंभीरपणे उत्तर देण्याऐवजी, पायावर पाय देण्याच्या भाषा म्हणजे उर्मटपणाच म्हणायला हवा. श्रावणबाळाची कावड वाहना-यांनी जरा मराठी वाड.मयाचाही नीट अभ्यास करावा आणि मगच पायावर पाय देण्याची भाषा करावी. आरोग्य राज्यमंत्री आजवर जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामुळे जिल्हा राज्यात लसीकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात हे लसीकरण एप्रिल व मे महिन्यात झालेले आहे. त्यामुळेच कोल्हापूरचे लसीकरणाची टक्केवारी वाढल्यासारखी वाटते, परंतु प्रत्यक्षात अन्य शहरातील लसीकरणाची संख्या पाहता मे व जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याचे स्पष्ट आहे.

त्यामुळे अन्य काही जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद ठेवावे लागले आहे. २१ जूनला राज्यात ३ लाथ ८१ हजार लसीकरण झाले असताना त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ३१८४ लसी दिल्या गेल्या. ही संख्या राज्यातील लसीकरणाच्या १ टक्काही नाही. २३ जूनला महाराष्ट्रातील विक्रमी ६,०२,००० लसीकरणामध्ये कोल्हापूर शहरात केवळ ४९८ लोकांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करत आहे हेच खरे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या