शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Corona vaccine Kolhapur :शारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:58 IST

Corona vaccine Kolhapur : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.

ठळक मुद्देशारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोलामागच्या दोन महिन्यांत लसीकरणात कोल्हापूर मागेच

कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई व अजित ठाणेकर यांनी लसीकरणावरून सुरू असलेल्या टीकेवरून दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात म्हटले आहे, लसीकरणाच्या विषयावर गंभीरपणे उत्तर देण्याऐवजी, पायावर पाय देण्याच्या भाषा म्हणजे उर्मटपणाच म्हणायला हवा. श्रावणबाळाची कावड वाहना-यांनी जरा मराठी वाड.मयाचाही नीट अभ्यास करावा आणि मगच पायावर पाय देण्याची भाषा करावी. आरोग्य राज्यमंत्री आजवर जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामुळे जिल्हा राज्यात लसीकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात हे लसीकरण एप्रिल व मे महिन्यात झालेले आहे. त्यामुळेच कोल्हापूरचे लसीकरणाची टक्केवारी वाढल्यासारखी वाटते, परंतु प्रत्यक्षात अन्य शहरातील लसीकरणाची संख्या पाहता मे व जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याचे स्पष्ट आहे.

त्यामुळे अन्य काही जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद ठेवावे लागले आहे. २१ जूनला राज्यात ३ लाथ ८१ हजार लसीकरण झाले असताना त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ३१८४ लसी दिल्या गेल्या. ही संख्या राज्यातील लसीकरणाच्या १ टक्काही नाही. २३ जूनला महाराष्ट्रातील विक्रमी ६,०२,००० लसीकरणामध्ये कोल्हापूर शहरात केवळ ४९८ लोकांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करत आहे हेच खरे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या