शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Kolhapur: बालिंगा पुलावरुन वाहतुकीस परवानगी, पालकमंत्र्यांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:30 IST

अवजड वाहने वगळून सर्व वाहनांना वाहतुकीची परवानगी

कोपार्डे : बालिंगा पूल धोकादायक असल्याचे कारण देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने बंद केलेल्या वाहतूक पुन्हा सुरु करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. अवजड वाहने वगळून सुरक्षितता बाळगत हलक्या वाहनासह दुचाकीना पुलावरून वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिला मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढले. नदीची पाणीपातळी बालिंगा पुलाच्या स्प्रींज लेवलला पोहोचल्याने खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. साबळेवाडी फाटा व नागदेवाडी फाटा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक बंद केली. ही वाहतूक साबळेवाडी, यवलुज, पाडळी बुद्रुक, प्रयागचिखली, आंबेवाडी, कोल्हापूर अशी वळवण्यात आल्याने लोकांना मोठा पल्ला ओलांडून यावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले तरी वाहतूक अडवण्याचा प्रकार झाला नव्हता.याबाबत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना थेट फोनवरून विनंती करून पुलावरील वाहतूक सुरू करण्याबाबत विनंती केली. राजेंद्र सूर्यवंशी यांनी बुधवारी आंदोलनाचा पवित्र स्वीकारला होता. आज पालकमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने चंद्रदीप नरके यांनी त्यांची भेट घेऊन वाहतुकीबाबत समस्या मांडून बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी खबरदारी बाळगून हलक्या व दुचाकी वाहनांना बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्याने साबळेवाडी फाटा व बालिंगे येथे लावण्यात आलेली बॅरिकेट्स हटवून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या करवीर पन्हाळा गगनबावडा राधानगरी शाहूवाडी तालुक्यातील हजारो लोकांनी सुटकेचा निस्वास टाकला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी