शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे जनता मेटाकुटीला, रोहिणी खडसे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:05 IST

समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार

कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईने टोक गाठले असताना हे सरकार भावनिक वातावरण करून दिशाभूल करत आहे. महागाईची झळ आपणा सर्वांना सहन करावी लागत असून, आता थांबायचे नाही, दुर्गेचे रूप घेऊन जुमला सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मेळावा मंगळवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.राेहिणी खडसे म्हणाल्या, या वयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा संघर्ष सुरू आहे. पक्षातून काही लोक बाजूला गेले असले तरी पुन्हा नेटाने उभे राहण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. तुम्हीही भाजप सरकारविरोधात गावागावांत जाऊन रान उठवा. कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या लबाड सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार आसूड ओढला. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने यांनी प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्नेहा देसाई, सुचित्रा पडवळ, वैशाली पाटील, शर्मिला सावंत, सुलोचना पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्मिता आवळे, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, भावना गाडेकर, अमर पाटील आदी उपस्थित होते.

झेंड्याची दोरी पवार यांच्यामुळेचमहिलांना पूर्वी पाळण्याची दोरी असायची; पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाची पदे मिळाली. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी तिच्या हाती झेंड्याची दोरी आल्याचे प्रा. म्हेत्रे यांनी सांगितले.

समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांमध्ये कोणती जागा कोणाला, याबाबत अनेक वेळा चर्चा झालेली आहे. थाेड्याच दिवसांत अंतिम निर्णय होईल. व्ही. बी. पाटील यांचे काम चांगले आहे. आमचा त्यांच्यासाठी प्रयत्न राहणार आहे; पण शेवटी समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार निश्चित केला जाईल, असे खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारRohini Khadseरोहिणी खडसेInflationमहागाई