शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे जनता मेटाकुटीला, रोहिणी खडसे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:05 IST

समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार

कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईने टोक गाठले असताना हे सरकार भावनिक वातावरण करून दिशाभूल करत आहे. महागाईची झळ आपणा सर्वांना सहन करावी लागत असून, आता थांबायचे नाही, दुर्गेचे रूप घेऊन जुमला सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मेळावा मंगळवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.राेहिणी खडसे म्हणाल्या, या वयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा संघर्ष सुरू आहे. पक्षातून काही लोक बाजूला गेले असले तरी पुन्हा नेटाने उभे राहण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. तुम्हीही भाजप सरकारविरोधात गावागावांत जाऊन रान उठवा. कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या लबाड सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार आसूड ओढला. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने यांनी प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्नेहा देसाई, सुचित्रा पडवळ, वैशाली पाटील, शर्मिला सावंत, सुलोचना पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्मिता आवळे, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, भावना गाडेकर, अमर पाटील आदी उपस्थित होते.

झेंड्याची दोरी पवार यांच्यामुळेचमहिलांना पूर्वी पाळण्याची दोरी असायची; पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाची पदे मिळाली. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी तिच्या हाती झेंड्याची दोरी आल्याचे प्रा. म्हेत्रे यांनी सांगितले.

समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांमध्ये कोणती जागा कोणाला, याबाबत अनेक वेळा चर्चा झालेली आहे. थाेड्याच दिवसांत अंतिम निर्णय होईल. व्ही. बी. पाटील यांचे काम चांगले आहे. आमचा त्यांच्यासाठी प्रयत्न राहणार आहे; पण शेवटी समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार निश्चित केला जाईल, असे खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारRohini Khadseरोहिणी खडसेInflationमहागाई