शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच पेन्शन, साखरेचे निर्यात अनुदान मिळाले : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:04 IST

HasanMusrif Kolhapur-पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच देशातील शेतकऱ्यांना चार महिन्यांची थकित पेन्शन आणि कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान मिळाले, हे दिल्लीतील आंदोलनाचे फलित आहे. गव्हाला हमीभाव आणि करारशेतीचा कायदा रद्दच्या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीत महिन्याभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किमान 'मन की बात'मध्ये तरी जाणून घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच पेन्शन, साखरेचे निर्यात अनुदान मिळाले : हसन मुश्रीफ गडहिंग्लजला १० कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ

गडहिंग्लज : पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच देशातील शेतकऱ्यांना चार महिन्यांची थकित पेन्शन आणि कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान मिळाले, हे दिल्लीतील आंदोलनाचे फलित आहे.गव्हाला हमीभाव आणि करारशेतीचा कायदा रद्दच्या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीत महिन्याभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किमान 'मन की बात'मध्ये तरी जाणून घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.गडहिंग्लज नगरपालिकेला राज्य शासनाकडून मिळालेल्या १० कोटी निधीतील विकास कामांचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.मुश्रीफ म्हणाले, हद्दवाढीमुळे गडहिंग्लज शहरात आलेल्या उपनगरांच्या मूलभूत नागरी सुविधांसाठी निधी देण्याचे आश्वासन आपण विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते, त्याची वचनपूर्ती झाली.मार्चपर्यंत आणखी १० कोटीचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून गडहिंग्लज पालिकेला मिळवून देईन.शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाची सत्ता असतानाही गडहिंग्लज पालिकेला निधी देऊन मुश्रीफांनी प्रचलित राजकारणाला फाटा दिला आहे. गडहिंग्लजमधील बेघरांना घरे बांधून देण्यासाठीही त्यांनी सहकार्य करावे. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केले.नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी आभार मानले.प्रांतकार्यालयाची जागा पालिकेला मिळवून देऊ!प्रांत कार्यालयासाठी गडहिंग्लज नगरपालिकेने भाड्याने दिलेली जागा महिनाभरात पुन्हा पालिकेला मिळवून देऊ,अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.चंद्रकांतदादांनी व्देषाचे राजकारण केलेविधान परिषदेच्या निवडणुकीत विशिष्ट व्यक्तीला मदत केल्याबद्दल चंद्रकांतदादांनी गडहिंग्लज पालिकेला ५ कोटीचा निधी दिला होता. परंतु, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत श्रीपतराव शिंदे यांनी आमच्याबरोबर आघाडी केल्यामुळे दिलेला निधी त्यांनी परत घेतला.तसेच जिल्ह्यातील ९ नगरपालिकांना शासनाकडून मिळालेला प्रत्येकी १ कोटीचा निधीही त्यांनी दिला नाही.त्यांच्यासारखा व्देषी राजकारणी मी पाहिला नाही,अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर