शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

शेवगा, द्राक्षे, गाजराची आवक वाढली: सणामुळे हरभरा डाळ, गुळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:36 AM

बाजारपेठेत हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर शेवगा, द्राक्षे व गाजराची आवक वाढली असून, कोथिंबीर वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर राहिले, तर काकडीचे दर कमी झाले आहेत. रविवारी आठवडा बाजारातील हे चित्र आहे.

ठळक मुद्देशेवगा, द्राक्षे, गाजराची आवक वाढली: सणामुळे हरभरा डाळ, गुळाची मागणी  कोथिंबीर वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर : काकडीचे दर झाले कमी

कोल्हापूर : बाजारपेठेत हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर शेवगा, द्राक्षे व गाजराची आवक वाढली असून, कोथिंबीर वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर राहिले, तर काकडीचे दर कमी झाले आहेत. रविवारी आठवडा बाजारातील हे चित्र आहे.लक्ष्मीपुरी येथील बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर भाजीपाला, फळे, कडधान्यांचे दर कमी-जास्त, स्थिर असल्याचे दिसून आले. आज, सोमवारी होळीचा सण असल्याने पुरणपोळीसाठी लागणाऱ्या हरभरा डाळीची व गुळाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. हरभरा डाळ ६५ ते ७० रुपये किलो व गूळ ५० ते ७० रुपये किलो असा दर होता, त्याच्या खरेदीसाठी गर्दी होती. मूग व तूरडाळीचे दर स्थिर असून, त्याची ११० रुपये किलोने विक्री सुुरू होती.शेवगा, द्राक्षे व गाजराची मोठी आवक होती. शेवग्याची एक पेंढी १० रुपये, द्राक्षांचे दर कमी झाले असून ते ४० ते ५० रुपये किलो, गाजर ३५ ते ४० रुपये किलो होते. कोथिंबीरच्या पेंढीची किरकोळ दरवाढ झाली असून, १० ते २५ रुपये पेंढी असा दर राहिला. अन्य भाजीपाल्यांचे दर स्थिर राहिले. यामध्ये १५ रुपयांना दोन मेथीच्या पेंढ्या, वांगी, दोडका, भेंडी, गवारी यांचे दर ४० रुपये किलो, तर बटाटे, कांद्याचे दर ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटोचे दर १० रुपये किलो, तर लसणाचे दर ८० ते १०० रुपये किलो असे स्थिर राहिले.काकडी, कलिंगड, लिंबूचे दर उतरलेबाजारात काकडीची आवक वाढल्याने दरही उतरले आहेत. गेल्या आठवड्यात ५० ते ६० रुपये किलो असणारा काकडीचा दर यावेळी ४० रुपये किलो राहिला. उन्हाळा असल्याने कलिंगडची आवक वाढली असून बाजारात एक नग १० ते ३० रुपये तर लिंबूचे दरही उतरले असून १० रुपयांना ५ नग असा दर बाजारात होता.फळांचे दरही स्थिरसफरचंद १२० ते १४० रुपये एक किलो, डाळींब १२० रुपये किलो व चिकू ६० ते ७० रुपये किलो व पेरू ६० ते ८० रुपये किलो असे फळांचे दरही बाजारात स्थिर राहिले. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर