शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती ही अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण कणा : अरुंधती सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:36 PM

शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्दे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर : कागदोपत्री व्यवहार कमी होऊन डिजिटल पेमेंट, कार्ड पेमेंट याबरोबरच मोबाईल बॅँकिंगच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही ग्राहकांच्या मागणीबरोबरच काळाची गरज बनलेली आहे. बॅँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल सुरक्षा पद्धती चांगल्या प्रकारे कार्यान्वित झालेली आहे. अनेक तरुणांना या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, असे प्रतिपादन रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया, विभागीय कार्यालय, मुंबई येथील साहाय्यक महाव्यवस्थापक अरुंधती सिन्हा यांनी गुरुवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.

अरुंधती सिन्हा पुढे म्हणाल्या, सुरक्षित आर्थिक व्यवहारांमध्ये जलदता आणण्यासाठी संपूर्ण बॅँकिंग उद्योगांसह अन्य पेमेंट सिस्टीम आॅपरेटर्सनाही या प्रणालीबाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. रोख आर्थिक व्यवहार कमी करून डिजिटल व्यवहारांकडे जनसामान्यांचा कल वाढविण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असली तरी त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल व्यवहारांसाठी आरबीआय एक सुरक्षित प्रणाली तयार करीत आहे.

अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, सायबर गुन्ह्यांकडे गंभीरतेने व सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये बॅँकिंग व्यवहारामध्ये काही चुकीच्या आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यासाठी बँक, वित्त आणि आॅनलाईन डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

याप्रसंगी आरबीआय मुंबई येथील विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक अंकुर सिंग, आदी उपस्थित होते. बँक आॅफ इंडिया कोल्हापूर, लीड बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. सी. तळुले यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बॅँक आॅफ इंडिया चेअर इन रुरल बॅँकिंगचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तीन आराखडेनव्या तंत्र प्रगत बॅँकिंग व्यवस्थेचा ई-पेमेंट हा भाग असून त्याबाबत जनजागृती करण्याचे काम रिझर्व्ह बॅँकेने हाती घेतले आहे. यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार केला असून सुरक्षित, खात्रीशीर, परवडणारी ई-देय प्रणाली करीत असताना खर्चघट, स्पर्धावाढ, सोईस्करता व विश्वसनीयता हे चार महत्त्वाचे घटक आहेत, असेही सिन्हा यांनी सांगितले. 

 

टॅग्स :SBIएसबीआयbankबँक