शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

कागल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:23 IST

जहाॅगीर शेख कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न गावोगावी राबविण्याच्या ...

जहाॅगीर शेख

कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न गावोगावी राबविण्याच्या स्पष्ट सूचना नेते मंडळीनी केल्या आहेत. तरीही जागा वाटपात नेत्यांच्या इच्छेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवल्याचे चित्र दिसत आहे. यातून वेगवेगळ्या आघाड्या आकारास येण्याच्या शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी हा प्रयोग कागल तालुक्यात झाला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा आघाडीचा फाॅर्म्युला जिल्हा बँक, पंचायत समितीमध्ये उघडपणे, तर खासदारकी आणि आमदारकीला छुप्या पद्धतीने उपयोगात आणला. माजी आमदार संजय घाटगे यांचीही सध्याची भूमिका मंत्री मुश्रीफ यांच्याशी मिळते - जुळते घेण्याचीच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता आल्याने उत्साही बनलेल्या नेते मंडळींनी गावचा विकास होण्यासाठी महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला ग्रामपंचायतीत राबवा. अशा सुचना केल्या आहेत, तर संजय घाटगेनी कार्यकर्ते ठरवतील तेच अंतिम अशी भूमिका घेतली आहे. पाच वर्षांपूर्वी भाजप - शिवसेना सत्तेवर आली होती. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले होते. अनेक गावात मुश्रीफ गटाविरूद्ध मंडलिक आणि दोन्ही घाटगे अशी पॅनेल झाली होती. आता समरजित घाटगे विरूद्ध मुश्रीफ मंडलिक घाटगे अशी आघाडी अनेक गावात दिसण्याची शक्यता आहे.

तुम्हाला चालते आम्हाला का नाही...

तालुक्यात मंत्री मुश्रीफ गटाचा प्रभाव जास्त आहे. त्यापाठोपाठ संजय घाटगे गटही प्रतिकूल परिस्थितीत आपली ताकद टिकवून आहे. तर समरजित घाटगे यांनी भाजपच्या झेंड्याखाली राजे गटाचा विस्तार केला आहे. मंडलिक गटही निर्णायक शक्ती राखून आहे. या चारही नेत्यांनी सोयीनुसार एकमेकांना मारलेल्या मिठ्या कार्यकर्ते लक्षात ठेवून आहेत. गावाची सत्ता हाती घेण्यासाठी तेही आपला स्वार्थ पाहात आहेत.

तालुक्यातील एकूण ८६ गावापैकी ५३ गावात निवडणुका होत आहेत. त्यामुळे नेते मंडळींची राजकीय ताकद आणि प्रभाव स्पष्ट होणार आहे. १७९ प्रभागातून ग्रामपंचायतीचे ५२७ सदस्य निवडले जाणार आहेत. सरपंच आरक्षण निश्चित नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रत्यक गावात आलेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधीही महत्वाची भूमिका बजावणार आहे.