शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

आरक्षणाचा सदस्य नसल्याने १७ गावांमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:15 IST

(डमी पाठवली आहे. नियोजनातील विषय) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १७ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने ...

(डमी पाठवली आहे. नियोजनातील विषय)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १७ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला आहे. सरपंच निवडीची सभा मंगळवारी नऊ तारखेला असून, त्या पार्श्वभूमीवर गावागावांत फोडाफोडीचे राजकारण सुुरू आहे. त्यांपैकी काही गावांमध्ये त्या प्रवर्गाचा विजयी उमेदवारच नाही; तर काही गावांमध्ये बहुमत नसलेल्या गटाकडे तो उमेदवार असल्याने बहुमत एका गटाला आणि सरपंच दुसऱ्या गटाचा अशी स्थिती निर्माण होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदा राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर म्हणजेच २७ जानेवारीला तालु्क्याच्या ठिकाणी झाले. या आणि पुढील कालावधीत मुदत संपलेल्या अशा १ हजार २५ ग्रामपंचायतींचे हे आरक्षण काढण्यात आले. त्यापैकी निवडणूक झालेल्या १७ गावांमध्ये सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे, अशा गावांची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र सरपंच निवडीच्या सभेनंतरच सर्व गावांमधील चित्र स्पष्ट होऊन त्यावर नंतर निर्णय दिला जाणार आहे.

---

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ४३३, निवडून आलेले सदस्य : ४ हजार २७

---

या गावांमध्ये पेच

गाडेगोंडवाडी, खटांगळे, उपवडे, भामटे कांगणी व चिंचणी (करवीर), बसर्गे, अरळगुंडी, मुत्नाळ (ता. गडहिंग्लज), वाठारतर्फ वडगाव, पट्टणकोडोली (हातकणंगले), किणे (आजरा), घोसरवाड, दत्तवाड, जैनापूर, शिरदवाड (शिरोळ), सुळकूड (ता. कागल).

--

काठावरच्या बहुमतात फोडाफोडी

काही गावांमध्ये निवडून आलेल्या दोन गटांमध्ये केवळ एका सदस्याने बहुमताचा फरक आहे. बहुमत मिळालेल्या गटात ५, तर विरोधी गटात ४ सदस्य निवडून आले आहेत. आरक्षण पडलेला उमेदवार विरोधी गटात आहे. अशा काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होत आहे.

--

पुढे काय होणार?

ज्या गावांमध्ये आरक्षित प्र‌वर्गाचा उमेदवार बहुमत असलेल्या किंवा नसलेल्या गटातदेखील नाही, तेथे नव्याने आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. ज्या गावांमध्ये अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण आहे; पण स्त्री उमेदवार नसेल त्या ठिकाणी त्याच आरक्षणाच्या पुरुषाला सरपंचपद मिळू शकते. काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत फोडाफोडीचे राजकारण झाले तर विरोधी गटातील सदस्य सरपंच होऊ शकतो. या सगळ्या घडामोडी मात्र ९ तारखेच्या सरपंच निवडीच्या सभेनंतरच होतील.

---