शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

स्मार्टफोनमधील ॲप काढून चीनविरोधातील लढ्यात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 10:42 IST

देशाला घातक असणाऱ्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत केले जात आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले चिनी ॲप काढून टाकणे तरुणाईने सुरू केले आहे. या माध्यमातून आपण चीनविरोधातील लढ्यात सहभाग असल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे.

ठळक मुद्देस्मार्टफोनमधील ॲप काढून चीनविरोधातील लढ्यात सहभागतरुणाईची भावना : केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

कोल्हापूर : देशाला घातक असणाऱ्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत केले जात आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले चिनी ॲप काढून टाकणे तरुणाईने सुरू केले आहे. या माध्यमातून आपण चीनविरोधातील लढ्यात सहभाग असल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे.केंद्र सरकारने चीनविरुद्ध पुकारलेल्या या सायबर वॉरबाबत लोकमतने तरुणाईच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या ॲप वापरासाठी व्यतित होणाऱ्या आपल्या मौल्यवान वेळेच्या बदल्यात चीन करोडो रुपये कमवीत होते. पण, आता वेळ आहे खडबडून जागे व्हायची, डोळे उघडून आपल्या देशाच्या भवितव्याची काळजी करायची. भारतीयांचा गोपनीय आणि वैयक्तिक डेटा ह्या ॲपद्वारे चोरला जातो, हे उघड झाले आहे. त्यामुळे बंदीचा निर्णय योग्य आहे.

सरकारने आता इतर चिनी वस्तूंना पर्यायी उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाशी संबंधित दोन माध्यमांमधील वादामुळे जवळपास ६० लाख भारतीयांनी प्ले स्टोअरवर टिक टॉकला सर्वात कमी रँकिंग दिले होते. ही मोहीम बरीच गाजली. त्यामुळे या जनभावनेला पुष्टी देणारा हा निर्णय आहे. हे विविध ॲप काढून टाकल्याने चीन विरुद्ध लढ्यात आपणही सामील आहोत अशी भावना तरुणाईसह सामान्य लोकांमध्ये तयार होऊ लागली आहे.बहुतांश ॲप डाउनलोडसाठी अजूनही उपलब्धही ॲप बंदी आणल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियाचा धुमाकूळ उडालेला आहे. वेगवेगळे मिम बनवून तरुणाई, नागरिक व्यक्त होत आहेत. मात्र, अजूनही प्ले स्टोअरवर यातील बहुतांश ॲप डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याबद्दल सामान्य माणसाच्या मनात अजून स्पष्टता नाही. शिवाय ज्यांच्या मोबाईलवर आधीपासून ही ॲप इंस्टाल आहेत त्यांचे काय होणार हे देखील समजणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया सोशल मिडिया अभ्यासक विनायक पाचलग यांनी व्यक्त केली.

सध्या चाललेल्या भारत-चीन संघर्षाच्या दृष्टीने पाहता चिनी ॲप वापरणे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. जगभरात चीनबद्दल नकारात्मकता वाढत असताना तेथून बाहेर पडणाऱ्या कंपनींना भारतात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न सरकारने करावेत.-अथर्व कुलकर्णी, विद्यार्थी, कोल्हापूर

आपला देशही तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात कमी नाही हे जगाला आणि चीनला दाखवून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे तरूणाईने चीनचे वेड डोक्यातून आणि स्वतःच्या मोबाईल मधून काढून टाकावे. स्वच्छ आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे एक पाऊल पुढे आत्मविश्वासाने टाकावे.-रिया बोंद्रे,विद्यार्थीनी, केआयटी कॉलेज

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनkolhapurकोल्हापूर