शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
4
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
5
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
6
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
7
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
8
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
11
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
12
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
13
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
14
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
15
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
16
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
17
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
18
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
19
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
20
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

Kolhapur: जागतिक वारसा स्थळ: पन्हाळावासीयांना अद्याप लेखी आश्वासन मिळेना, संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:03 IST

युनेस्कोची समिती येणार सप्टेंबरमध्ये : जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

संदीप आडनाईक कोल्हापूर : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करू नये अशी भूमिका घेणाऱ्या पन्हाळगडावरील नागरिकांसोबत मे महिन्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वस्ती उठणार नसल्याचे आश्वासन दिल्याने थोडासा दिलासा मिळाला असला तरी, याबाबत दोन महिन्यात त्यांनी कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने संभ्रम अजूनही कायम आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेला पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यात येत आहे. यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने पन्हाळा किल्ल्याची निवड केली आहे. हे पथक वेळापत्रकानुसार सप्टेंबर महिन्यात पन्हाळगडावर येणार आहे, परंतु पन्हाळगडावरील लोकवस्ती उठवणार या गैरसमजामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मे महिन्यात रहिवाशांसोबत जरी चर्चा केली असली तरी तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयाकडे लेखी मागणी करूनही काही प्रश्नांना लेखी उत्तरे मिळालेली नाहीत. याशिवाय समन्वयासाठी दहाजणांची समिती करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांच्या माध्यमातून युनेस्कोसंदर्भातील पुढच्या हालचाली आणि प्रगती कळवण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. ही समिती स्थापन करण्यासाठी मुदत दिली होती, मात्र ही समिती म्हणजे सरकारच्या निर्णयाला मान्यता मिळेल म्हणून पन्हाळकरांनी अद्याप नावे दिलेलीच नाहीत. दरम्यान, पन्हाळ्याच्या एका समितीने राजस्थानातील जेसलमेर किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष आढावा घेतला आहे.

  • जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन महिन्यात लेखी आश्वासन दिलेले नाही
  • मोबाइल टॉवर, पाण्याची टाकी हलविण्याची पूर्वतयारी सुरू
  • नव्या समितीच्या अधिकाराबाबत संभ्रमावस्था
  • पन्हाळगडावरील बांधकामाचे अधिकार मिळणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही..

पन्हाळकरांच्या समितीला अधिकार असणार का, लेखी आश्वासन मागूनही दोन महिने टाळाटाळ, दूरध्वनी, आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) आणि पाण्याच्या टाकी हलविण्याची तयारी सुरू असताना प्रशासनावर विश्वास कसा ठेवायचा अशी नागरिकांची भूमिका आहे. -ॲड. रवींद्र तोरसे, माजी नगरसेवक.