शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Kolhapur: पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक रद्द, केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:57 IST

इतिहासात प्रथमच असा निर्णय

कोल्हापूर-कबनूर : गंगानगर इचलकरंजी येथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची जानेवारीत झालेली निवडणूक केंद्रीय सहकार निवडणूक प्राधिकरणाने गुरुवारी रद्द केली. कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांना चांगलाच दणका बसला.उमेदवारांच्या अनुमोदक सूचकांनाही वार्षिक सर्वसाधारण सभेची उपस्थिती, सलग चार वर्षे कारखान्यास गाळपासाठी ऊस घातला पाहिजे. या पोटनियमातील तरतुदी लागू केल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद झाले व निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून संचालक मंडळाने आमच्या गटाचे अर्ज छाननीमध्ये बाद केले, अशी तक्रार विरोधी गटाच्या नेत्या रजनीताई मगदूम यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे केली होती. आता नव्याने ११ मे रोजी मतदान होणार आहे. त्याची प्रक्रिया २९ एप्रिलपासून सुरू होत आहे.हा कारखाना मल्टिस्टेट असल्याने त्याची निवडणूक केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे निवडणूक अधिकारी होते. कारखान्याची वर्ष २०२५-२०३० साठी संचालकांच्या १७ जागांसाठी १९ जानेवारीस झाली होती. संचालकांच्या १७ जागांसाठी एकूण ९२ जणांनी १०४ अर्ज दाखल केले होते; पण विरोधी गटाचे सर्वच अर्ज बाद झाले. पी.एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली होती. कारखान्यावर पाचव्यांदा त्यांनी गटाची सत्ता प्रस्थापित केली होती.

इतिहासात प्रथमच असा निर्णयएखाद्या साखर कारखान्याची झालेली निवडणूक लगेच रद्द होण्याची ही राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दृष्टिक्षेपात निवडणूक प्रक्रिया

  • अर्ज भरण्याची प्रक्रिया : २९ एप्रिल ते ३ मे
  • छाननी : ५ मे
  • पात्र उमेदवारांची यादी जाहीर : ५ मे
  • अर्ज माघार : ६ मे
  • मतदान : ११ मे
  • मतमोजणी : १२ मे
  • निकाल जाहीर : १४ मे

संचालकांच्या जागा : १७उत्पादक सभासद : १३९६०, ब वर्ग : ११८८, संस्था-१०५कारखाना रेणुका शुगर्सला १८ वर्षांच्या कराराने भाड्याने चालवायला दिला असून त्याची मुदत २०२९ पर्यंत.

काय ठरले महत्त्वाचे?कारखान्याचे पोटनियम की मल्टिस्टेट को-ऑप. कायद्याची तरतूद यातील कशाला महत्त्व द्यायचे असा पेच या निवडणुकीत तयार झाला होता. कारखान्याच्या पोटनियमाला केंद्रीय सहकार विभागानेच मंजुरी दिलेली आहे म्हणून निवडणूक विभागाने पोटनियमाच्या अधीन राहून विरोधी गटाचे अर्ज छाननीत बाद केले. ते कायद्याला विसंगत होते म्हणून ही निवडणूकच रद्द करण्यात आली. चार वर्षे सलग आणि सर्व वार्षिक सभेला उपस्थिती हा उमेदवारासाठीची तरतूद आहे; परंतु ती अनुमोदक-सूचकसाठी नाही. कारखान्याने काहीही पोटनिमय करावेत आणि ते आधार मानून निवडणूक यंत्रणेने निर्णय द्यावेत याला निवडणूक रद्दच्या आदेशाने दणका बसला.

ज्यांनी या कारखान्याची उभारणी केली त्या रत्नाप्पाअण्णांच्या कार्यकर्त्यांचा आणि सामान्य ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा हा विजय आहे. आम्ही नव्याने सभासदांकडे कौल मागायला जाऊ. - रजनीताई मगदूम

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024