शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदी धोकापातळीकडे, इशारा पातळी ओलांडली, ‘राधानगरी’चे चार दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारीही पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे, मात्र, बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पाचवा दरवाजाही उघडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पुराच्या पाण्याची फूग जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली आहे.

ठळक मुद्देपंचगंगा नदी धोकापातळीकडे, इशारा पातळी ओलांडली‘राधानगरी’चे चार दरवाजे खुले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारीही पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे, मात्र, बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पाचवा दरवाजाही उघडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पुराच्या पाण्याची फूग जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५४.५0 मिमी इतका पाऊस पडला आहे तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी १३.४३ मिमी पाऊस झाला आहे.गेले दोन ते तीन दिवस जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने व धरणातून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने ४१.७ फुटांची इशारा पातळी ओलांडत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.चांदोली धरणातून विसर्ग सुरू सांगली: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या वारणा नदीवरील चांदोली धरणातून आज-गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून हा विसर्ग होत आहे. धरण नव्वद टक्के भरले असून चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा सलग सहा दिवस जोर आहे. वारणा नदीला पूर आला आहे. आता पाणी सोडण्यात आल्याने पुराची वाढणार आहे.पावसाचा जोर जरी कमी असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे. ८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. इतर जिल्हा मार्ग २१, ग्रामीण मार्ग २४ असे ४५ मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, यापैकी नऊ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे खंडित झाली आहे.बर्की लघुपाटबंधारे योजनेच्या परिसरातही पावसाचे प्रमाण जास्त आहे. पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या रुई येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयावरील पाण्याची धोका पातळी ७० फुटापर्यंत वाढली आहे. तसेच वडणगे पोवार पाणंद रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. कसबा बावडा ते शिये रोड या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. शिरोली एमआयडीसीचे पोलीस आणि बावडा बाजूला शाहूपुरी पोलीसांनी वाहतूक बंद केली आहे.

प्रयाग तीर्थक्षेत्र पुराच्या पाण्यातकोल्हापूर जिल्ह्याची भाग्यदायिनी असलेल्या पंचगंगा नदीला जेथे कुंभी, कासारी, तुळसी आणि भोगावती या नद्या तसेच सरस्वती या उपनदीचा संगम होतो, त्या प्रयाग तीर्थक्षेत्र पुराच्या पाण्याने वेढलेले आहे. येथील पुरातन दत्त मंदिर तसेच गणेश मंदिर पाण्यात आहॆ. या पाण्यामुळे प्रयाग ते वरणगे पाडळी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चांदोली धरणातून विसर्ग सुरूसांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या वारणा नदीवरील चांदोली धरणातून आज-गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून हा विसर्ग होत आहे. धरण नव्वद टक्के भरले असून चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा सलग सहा दिवस जोर आहे. वारणा नदीला पूर आला आहे. आता पाणी सोडण्यात आल्याने पुराची वाढणार आहे.गगनबावडा येथे वाहतूक बंदलोंघे जवळ पाणी वाढत असून सद्यस्थितीला पन्नास टक्के पाणी रस्त्यावर आलेले आहे. यामुळे कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य रस्त्याची वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूरकडे येणारी वाहतूक गगनबावडा येथे बंद करण्यात आली आहे. तर गांधीनगर-चिंचवड रस्ता ,चिंचवड फाट्याच्या पुढे बंद झाला आहे, मात्र, चिंचवड मुडशिंगी मार्गे वाहतूक सुरू आहे.राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळीही ४१ फूट १0 इंच इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण ८३ बंधारे पाण्याखाली आहेत तसेच कोल्हापूर शहरातील सुताररवाडा येथील चार कुटुंबातील २३ जणांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे बालींगा पुलाचे ठिकाणी पुराचे पाणी मच्छापर्यंत आले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद केला आहे. खोची येथील दुधगांव बंधाºयावरही पाणी वाढले असून आपत्ती व्यवस्थापनाने बॅरिकेटींग केले आहे. याशिवाय डवडे लाटवडे पुल पाण्याखाली गेला आहे.सावधानतेचा इशारावारणा धरणातील जलाशयाची पाणी पातळी ६२६.९० मी. इतकी झाली आहे. धरण परिसरात अतिवृष्टी होत असून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी बारा वाजता २५00 क्युसेक्स इतका विसर्ग धरणाच्या सांडव्यावरुन नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने, नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व स्तरांवर सावधानतेबाबत इशारा देण्यात आल्याची माहिती वारणावती वारणा पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी टी. एस. धामणकर यांनी दिली आहे.राधानगरीतून ७११२ घनफूट जलविसर्गराधानगरी धरण मंगळवारी (दि. ३०) रात्री भरल्यानंतर बुधवारी सकाळपासून क्रमांक तीन, पाच व सहा असे तीन तर गुरुवारी चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. त्यांतून प्रतिसेकंद प्रतिसेकंद ७११२ घनफूट जलविसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने या नदीचे पाणी विस्तीर्ण भागात पसरले आहे.आकडेवारी पुढीलप्रमाणे-हातकणंगले- ४0.३८ मिमी एकूण ४३४.७९ मिमी, शिरोळ- ३७.७१ मिमी एकूण ३२७ मिमी, पन्हाळा- ६८.२९ एकूण १0८८.१४, शाहूवाडी- ७३.६७ मिमी एकूण १४८९.१७, राधानगरी- ८१.५0 मिमी एकूण १४१0.८३ मिमी, गगनबावडा- १५४.५0 मिमी एकूण ३२२८ मिमी, करवीर- ६७.९१ मिमी एकूण ८७६.0९ मिमी, कागल- ६0.१४ मिमी एकूण ८५0.५७ मिमी, गडहिंग्लज-१३.४३ मिमी एकूण ५७५.२९ मिमी, भुदरगड- ४५.४0 मिमी एकूण ११२२.२0 मिमी, आजरा- ४४ मिमी एकूण १४१६.२५ मिमी, चंदगड- २९.५0 मिमी एकूण १३७९ मिमी इतका पाऊस झाला आहे.मगरी काठाबाहेर येण्याची शक्यता, सतर्कतेचा इशाराकृष्णा, पंचगंगा आणि वारणा या नद्यांची पाणी पातळी वाढली असून प्रवाह देखील तीव्र आहे. त्यामुळे मगरी नदी बाहेर येण्याची दाट शक्यता आहे तरी काठावरील ग्रामस्थांनी मगर दिसल्यास मारण्याचा किंवा तिला डिवचण्याचा प्रयत्न न करता त्वरित यांच्याशी वनविभाग किंवा वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन अँड रेस्क्यू सोसायटी, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर