शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 14:24 IST

धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर: राधानगरी धरणाच्या क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.    

गेल्या ३ दिवसात जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळीत गेल्या ३ दिवसात १३ फूटांनी वाढ होऊन आज ती ३३ फूट इतकी आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तुळशीतून १ हजार ११, कुंभीतून १ हजार ८५० कासारीमधून १ हजार २५० असा  पंचगंगा नदीतून ११ हजार २२३ एवढा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर राजाराम बंधाऱ्यातून ३३ हजार ३३२ क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे. म्हणजेच मुक्त पाणलोट क्षेत्रातून २२ हजार १०९ क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे.    

तसेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील बांदिवडेकर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर