शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पाकची साखर मुंबईत : तीस हजार क्विंटलची आयात- साखरेचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:36 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. ...

ठळक मुद्देनिर्यातीच्या बदल्यात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयातीला मुभा देण्याच्या धोरणाचा एका बड्या कंपनीने उठविला फायदा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.

या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून साखरेचे दर गडगडले आहेत. साखर उद्योगाच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेले वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नाही. परिणाम देशांतर्गत बाजारपेठ कमालीची घसरल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयातशुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाल्याने साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत.परिणामी स्थानिक साखरेला फटका बसत असून, आधीच दरात घसरण झाली असताना त्यात हे संकट उभे राहिल्याने साखरउद्योग तग धरणार का? याविषयीची चिंता व्यक्तकेली जात आहे.घाऊक बाजारात साखर २४२० रुपयेसाखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. कारखान्यांमध्ये साखरेची गोडावून फुल्ल आहेत आणि मागणी नाही. त्यामुळे सध्या बाजारात प्रतिक्विंटल २४२० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.सहा महिने ‘रेक’ मोकळीच  कोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी, आदी राज्यांत जात होती; पण गेले सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाहीतर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर