शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पाकची साखर मुंबईत : तीस हजार क्विंटलची आयात- साखरेचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:36 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. ...

ठळक मुद्देनिर्यातीच्या बदल्यात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयातीला मुभा देण्याच्या धोरणाचा एका बड्या कंपनीने उठविला फायदा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.

या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून साखरेचे दर गडगडले आहेत. साखर उद्योगाच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेले वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नाही. परिणाम देशांतर्गत बाजारपेठ कमालीची घसरल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयातशुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाल्याने साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत.परिणामी स्थानिक साखरेला फटका बसत असून, आधीच दरात घसरण झाली असताना त्यात हे संकट उभे राहिल्याने साखरउद्योग तग धरणार का? याविषयीची चिंता व्यक्तकेली जात आहे.घाऊक बाजारात साखर २४२० रुपयेसाखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. कारखान्यांमध्ये साखरेची गोडावून फुल्ल आहेत आणि मागणी नाही. त्यामुळे सध्या बाजारात प्रतिक्विंटल २४२० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.सहा महिने ‘रेक’ मोकळीच  कोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी, आदी राज्यांत जात होती; पण गेले सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाहीतर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर