कडधान्यांचा अनुशेष भरण्यासाठी ‘पॅकेज’

By Admin | Updated: July 3, 2015 01:18 IST2015-07-03T01:03:45+5:302015-07-03T01:18:28+5:30

मोफत बियाणे : कोल्हापूरसह राज्यातील सात जिल्ह्यांची निवड, बांधावर तूर लागवडीस प्रोत्साहन

'Package' to fill the backlog of cereals | कडधान्यांचा अनुशेष भरण्यासाठी ‘पॅकेज’

कडधान्यांचा अनुशेष भरण्यासाठी ‘पॅकेज’

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कडधान्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील आठ जिल्ह्यांत बांधावर तुरीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे मोफत पॅकेज दिले जात आहे. आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ३७५ क्विंटल तूर बियाणे कृषी विभागातर्फे मोफत दिले जात आहे. याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर तूर लागवडीचे उद्दिष्ट आहे.
आंतर पीक म्हणून तूर बियाणे घेतल्यास शेकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असे कृषी प्रशासनाचे म्हणणे आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुख्य पीक ऊस आहे. सलग ऊस लागवड होत असल्यामुळे बांधही मोठे नसतात. त्यामुळे कडधान्याचे उत्पादन राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कमी होते. ते वाढावे म्हणून बांधावरील तूर लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१६ हे ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने चालू खरीप हंगामासाठी आंतरर पीक म्हणून कडधान्याचे अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कडधान्याचे उत्पादन कमी होणाऱ्या आठ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या जिल्ह्यात भात व अन्य पिकांच्या बांधावर तूर पीक घ्यावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. बांधावर तूर टोकण करण्यासाठी एक हेक्टरसाठी एक किलो बी.एस.एम.आर. ७३६ जातीचे बियाणे, असे प्रमाण कृषी प्रशासनाने निर्धारित केले आहे.
बियाणे वाटप सुलभ व्हावे, म्हणून २५० ग्रॅमचे एक पाकीट आहे. कोरडवाहू आणि बागायत क्षेत्रांसाठी तूर फायदेशीर आहे. तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. जास्तीज जास्त शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. बांधावर तूर लागवड केल्याने शेतातील उत्पन्नाबरोबरच बोनस उत्पन्न मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील उद्दिष्ट
तालुकानिहाय तूर बियाणांचे वाटप क्विंटलमध्ये असे : हातकणंगले-५० किलो, पन्हाळा-५, शाहूवाडी-७, राधानगरी-६, गगनबावडा-१, करवीर-४, कागल-४, गडहिंग्लज- ४.५०, भुदरगड- ६, आजरा-५, चंदडग-७.


जिल्ह्यातील उद्दिष्ट
तालुकानिहाय तूर बियाणांचे वाटप क्विंटलमध्ये असे : हातकणंगले-५० किलो, पन्हाळा-५, शाहूवाडी-७, राधानगरी-६, गगनबावडा-१, करवीर-४, कागल-४, गडहिंग्लज- ४.५०, भुदरगड- ६, आजरा-५, चंदडग-७.

बांधावर तुरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे आवश्यक आहे, त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- मोहन आटोळे,
जिल्हा कृषी अधीक्षक

Web Title: 'Package' to fill the backlog of cereals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.