शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

...अन्यथा पुणे-बंगलोर महामार्ग रोखणार : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:12 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा, ऊर्जामंत्र्यांसमवेत सात वेळा अशा आतापर्यंत ११ वेळा बैठका होऊनही कृषिपंपांची पोकळ थकबाकी, लघुदाब ग्राहकांसाठी ...

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात आश्वासनांची पूर्तता न केल्यास कृषिपंपधारक आक्रमक होतील

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा, ऊर्जामंत्र्यांसमवेत सात वेळा अशा आतापर्यंत ११ वेळा बैठका होऊनही कृषिपंपांची पोकळ थकबाकी, लघुदाब ग्राहकांसाठी दरनिश्चितीसह वीज दरवाढीसंदर्भात शासनाने आश्वासनांपलीकडे ठोस निर्णय घेतलेला नाही. या आश्वासनांची पूर्तता हिवाळी अधिवेशनात केली नाही तर कृषिपंपधारक पुणे-बंगलोर महामार्ग रोखून धरतील, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे पाठविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी शनिवारी प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, कृषिपंपधारकांची पोकळ थकबाकी, वाढीव बिले यासंदर्भात शासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने गेल्या मार्चमध्ये कृषिपंपधारकांनी मुंबईत धडक मोर्चा काढला होता.

यावेळी ४१ लाख कृषिपंपधारक वीज ग्राहकांची बिले १५ आॅगस्ट २०१८ पूर्वी तपासून दुरुस्त करण्यात येतील व त्यानंतर अचूक बिलाच्या आधारे नवीन कृषिसंजीवनी योजना राबविण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व पाणीपुरवठा संस्थांची वीज बिले १ रुपया १६ पैसे प्रतियुनिट या दराने २०२० पर्यंत कायम राहतील, असे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता वाढीव दराने वीज बिले येत आहेत. बिले न भरल्यास वीजजोडणी तोडण्याच्याही नोटिसाही लागू झाल्या आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गStrikeसंपkolhapurकोल्हापूर