अन्यथा, जिल्ह्यातील दीड हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:43+5:302021-03-09T04:25:43+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील दि. १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नसलेल्या ...

अन्यथा, जिल्ह्यातील दीड हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील दि. १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नसलेल्या १ हजार ५६३ ग्राहकांकडे १५ कोटी ५२ लक्ष रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे,असे महावितरणचे आवाहन आहे.
सांघिक व प्रादेशिक कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. अद्यापपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील वाणिज्य वर्गवारीतील २० हजार ४४७ ग्राहकांनी २३ कोटी ५२ लक्ष रुपये तर औद्योगिक वर्गवारीतील ६ हजार ९६ ग्राहकांनी २८ कोटी ८७ लक्ष रुपये वीज बील थकबाकी भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे महावितरण प्रशासनाने पत्रकाव्दारे कळविले आहे.