शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

...अन्यथा महापालिकेला हातगाड्यासह घेराव, सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:08 IST

कोल्हापूर शहरात फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई तातडीने थांबवावी; अन्यथा महापालिकेवर हातगाड्यांसह घेराव घालू, असा इशारा सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने दिला. शहरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे.

ठळक मुद्दे ...अन्यथा महापालिकेला हातगाड्यासह घेराव, सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचा इशाराअन्यायी कारवाईसंदर्भात दोन दिवसांत आयुक्तांना भेटणार

कोल्हापूर : शहरात फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई तातडीने थांबवावी; अन्यथा महापालिकेवर हातगाड्यांसह घेराव घालू, असा इशारा सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने दिला. शहरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे.

या संदर्भातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी दोन दिवसांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेण्याचा निर्णय झाला. दरम्यान, शहरातील एकही फेरीवाल्यावर कारवाई करता कामा नये, अशीही भूमिका घेण्यात आली. तसा निरोपही त्यांनी आयुक्तांना फोनवरून दिला.यावेळी कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, फेरवाल्यांसंदर्भात महापालिकेचा नियोजनशून्य कारभार आहे. फेरीवाल्यांचा विचार न करताच जागाबदल केला जात आहे. राजारामपुरीतील फेरीवाल्यांचे परीख पूल येथे स्थलांतर करण्यात येत आहे. फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण झाले आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कारवाई करता कामा नये.दिलीप पोवार म्हणाले, प्रशासनाचे कोणतेच नियोजन नाही. फेरीवाला कृती समिती असताना परस्पर चर्चा न करता कारवाई केली जात आहे. फेरीवाला कायद्याची पायमल्ली सुरू आहे. सर्व्हेक्षण झाले असताना अंमलबजावणीसाठी प्रशासनाला अवधी नाही. एकाची गाडी काढली म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरून स्टँडवरील सर्व गाड्या काढणे योग्य नाही.रघुनाथ कांबळे म्हणाले, शहराची लोकसंख्या साडेसहा लाख आहे. त्या मानाने नियमानुसार किमान १३ हजार फेरीवाले पाहिजेत. मात्र, महापालिकेकडे केवळ ४१०० फेरीवाल्यांची नोंद आहे. सर्व्हे करणाऱ्या कंपनीने घाईगडबडीने काम केले आहे. सात हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे बाकी आहे. इचलकरंजीमध्ये फेरीवाल्यांचा शोध घेऊन सर्व्हे केला जात आहे. येथे आहे त्या फेरीवाल्यांचा सर्व्हे केला नाही. राजारामपुरी आणि स्टँडवर कोणीतरी एकाने सांगितले म्हणून कारवाई केली. हे चुकीचे आहे. येथून पुढे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. पुनर्वसन केल्याशिवाय एकाही फेरीवाल्यावर कारवाई करता कामा नये.महापालिकेमाजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, शहरातील कोणत्याही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वी कृती समितीला विश्वासात घेतले पाहिजे. महापालिकेचा मनमानी कारभार असाच सुरू राहिला तर महापालिकेवर हातगाड्यांसह घेराव घालावा लागेल. चार वर्षांपासून फेरीवाल्यांची फी महापालिकेला जमा झालेली नाही. यामध्ये महापालिकेचेच नुकसान आहे. यावेळी माजी नगरसेवक अशोक भंडारे, अनिल कदम, किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.

मरगळ झटकाकृती समितीच्या बैठकीत फेरीवाल्यांचे नेते माजी महापौर वळंजू आणि सुरेश जरग यांनी घरचा आहेर दिला. जरग म्हणाले, फेरीवाल्यांचीही काही चुका आहेत. सर्वेक्षणात १२०० फेरीवाल्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. परिणामी बायोमेट्रिक मिळालेली नाहीत; तर वळंजू यांनी, कृती समितीची प्रशासनासोबत वर्षभरात एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला फावत आहे. फेरीवाल्यांना कोणी वाली नसल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे सर्वांनी आता मरगळ झटकली पाहिजे. महापालिकेला कारवाई करताना विचार करावा लागेल, असे आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर