शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण; ‘कारवाई करा’, पण करणार कोण ?

By भीमगोंड देसाई | Updated: May 27, 2024 13:19 IST

१२ वर्षांत पोकळ आश्वासन : अधिकारी बदलले तरी एकच उत्तर, मूळ प्रश्न मात्र कायम

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालयात जाऊन बारा वर्षे उलटून गेली तरी अजूनही पंचगंगा गटारगंगाच राहिली आहे. या कालावधीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले; पण प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या बैठकीत ‘प्रदूषणकारी घटकांवर कारवाई करा,’ हा पोकळ सल्ला मात्र कायमच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषणप्रश्नी आढावा घेण्यासाठी शनिवारी आलेले विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हेही असाच सल्ला देऊन निघून गेले. परिणामी अधिकाऱ्यांनी आपला कार्यकाळ ‘कारवाई करा,’ म्हणतच पूर्ण करण्याचे करायचे ठरवले आहे का ? ज्यांच्या हातात ठोस कारवाई करण्याचे अधिकार आहेत, तेच मिळमिळीत भूमिका का घेत आहेत ? प्रदूषण करणारे घटक, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे संगनमत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.नदीतील पाणीप्रदूषण कोणामुळे होत आहे, त्याला कोण जबाबदार आहे, हे जगजाहीर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह सर्व यंत्रणेला याची माहिती आहे. तरीही बारा वर्षांपासून पर्यटनाला आल्याप्रमाणे कोल्हापुरात विभागीय आयुक्त येतात आणि प्रदूषणकारी घटकांवर कारवाई करा, असा मोघम सल्ला देऊन निघून जात आहेत. कारवाई किती जणांवर केली याचा जाब विचारणे, जे कारवाई करीत नाहीत, त्यांच्यावर बैठकीतच कारवाई करणे अपेक्षित असताना ‘कारवाई करा’ असा प्रशासनातील प्रचलित इशारा देत असल्याचे अधिकाऱ्यांचेही हसे होत आहे.उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून दर महिन्याला अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानंतर सवडीनुसार त्या-त्या वेळचे विभागीय आयुक्त बैठका घेत राहिले. बैठका घेणे, प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करणे यातच दहा वर्षे निघून गेली.

अजूनही कोल्हापूर, इचलकरंजीसह नदीकाठांवरील गावांतील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. नदीतील पाण्याचे प्रदूषण कायम आहे. इचलकरंजीतील काळ्या ओढ्याचे पाणी थेट नदीत येते. नदी गटारगंगाच राहिली आहे. नदीतील वाहते पाणी कमी झाल्यानंतर प्रदूषणाची तीव्रता वाढते. मासे तडफडून मरतात. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटीस देऊन कारवाईचे नाटक करते. तोपर्यंत पाऊस सुरू होते. पावसाळ्यात शहरातील सर्वांत मोठ्या असलेल्या जयंती नाल्यातून सांडपाणी थेट नदीत मिसळते.

चांगले दाखवायचे अन् प्रदूषण झाकायचेविभागीय आयुक्तांची बैठक असल्याने शनिवारी सकाळपासूनच जयंती नाल्यावरील बंधाऱ्यात साठलेला कचरा काढण्यासाठी महापालिका कर्मचारी कार्यरत होते. तरीही तेथे प्लास्टिकचा कचरा कायम होता. नाल्यातील खालील बाजूकडील सांडपाणी वाहत नदीत जात होते. सीपीआर नाला, बापट कॅम्प, राजहंस प्रिंटिंग प्रेस येथून सांडपाणी थेट पंचगंगा नदीत जाते. याची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी प्राधान्याने करायला पाहिजे; पण हे झाकून ठेवून दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थानिक अधिकाऱ्यांनी दाखवल्याचे उघड झाले आहे.

दीर्घ म्हणजे किती ?पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येऊन १२ वर्षे झाली. १२ वर्षांतील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ‘दीर्घकालीन उपाययोजना’ सुरू आहेत. म्हणजे इतक्या वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण करता आली नाही, ही नामुष्की उघड झाली आहे. ‘दीर्घकालीन’ म्हणजे किती, प्रदूषणामुळे मनुष्यहानी झाल्यावरच उपाययोजना पूर्ण होणार का ? हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे.

विभागीय आयुक्त, प्रदूषण करणाऱ्या कितीजणांवर कारवाई केली, कारवाई नसेल तर का केली नाही याचा जाब विचारणे, कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांवर जागीच कारवाई करणे, हे न करता मोघमपणे कारवाई करा, असे सांगून निघून गेले. बारा वर्षांपासून हेच सुरू आहे. नदीत प्रदूषित पाणी मिसळण्याची ठिकाणे दाखवणे अपेक्षित होते. तसेही झालेले नाही. - दिलीप देसाई, याचिकाकर्ते, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण