शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण; ‘कारवाई करा’, पण करणार कोण ?

By भीमगोंड देसाई | Updated: May 27, 2024 13:19 IST

१२ वर्षांत पोकळ आश्वासन : अधिकारी बदलले तरी एकच उत्तर, मूळ प्रश्न मात्र कायम

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालयात जाऊन बारा वर्षे उलटून गेली तरी अजूनही पंचगंगा गटारगंगाच राहिली आहे. या कालावधीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले; पण प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या बैठकीत ‘प्रदूषणकारी घटकांवर कारवाई करा,’ हा पोकळ सल्ला मात्र कायमच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषणप्रश्नी आढावा घेण्यासाठी शनिवारी आलेले विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हेही असाच सल्ला देऊन निघून गेले. परिणामी अधिकाऱ्यांनी आपला कार्यकाळ ‘कारवाई करा,’ म्हणतच पूर्ण करण्याचे करायचे ठरवले आहे का ? ज्यांच्या हातात ठोस कारवाई करण्याचे अधिकार आहेत, तेच मिळमिळीत भूमिका का घेत आहेत ? प्रदूषण करणारे घटक, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे संगनमत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.नदीतील पाणीप्रदूषण कोणामुळे होत आहे, त्याला कोण जबाबदार आहे, हे जगजाहीर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह सर्व यंत्रणेला याची माहिती आहे. तरीही बारा वर्षांपासून पर्यटनाला आल्याप्रमाणे कोल्हापुरात विभागीय आयुक्त येतात आणि प्रदूषणकारी घटकांवर कारवाई करा, असा मोघम सल्ला देऊन निघून जात आहेत. कारवाई किती जणांवर केली याचा जाब विचारणे, जे कारवाई करीत नाहीत, त्यांच्यावर बैठकीतच कारवाई करणे अपेक्षित असताना ‘कारवाई करा’ असा प्रशासनातील प्रचलित इशारा देत असल्याचे अधिकाऱ्यांचेही हसे होत आहे.उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून दर महिन्याला अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानंतर सवडीनुसार त्या-त्या वेळचे विभागीय आयुक्त बैठका घेत राहिले. बैठका घेणे, प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करणे यातच दहा वर्षे निघून गेली.

अजूनही कोल्हापूर, इचलकरंजीसह नदीकाठांवरील गावांतील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. नदीतील पाण्याचे प्रदूषण कायम आहे. इचलकरंजीतील काळ्या ओढ्याचे पाणी थेट नदीत येते. नदी गटारगंगाच राहिली आहे. नदीतील वाहते पाणी कमी झाल्यानंतर प्रदूषणाची तीव्रता वाढते. मासे तडफडून मरतात. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटीस देऊन कारवाईचे नाटक करते. तोपर्यंत पाऊस सुरू होते. पावसाळ्यात शहरातील सर्वांत मोठ्या असलेल्या जयंती नाल्यातून सांडपाणी थेट नदीत मिसळते.

चांगले दाखवायचे अन् प्रदूषण झाकायचेविभागीय आयुक्तांची बैठक असल्याने शनिवारी सकाळपासूनच जयंती नाल्यावरील बंधाऱ्यात साठलेला कचरा काढण्यासाठी महापालिका कर्मचारी कार्यरत होते. तरीही तेथे प्लास्टिकचा कचरा कायम होता. नाल्यातील खालील बाजूकडील सांडपाणी वाहत नदीत जात होते. सीपीआर नाला, बापट कॅम्प, राजहंस प्रिंटिंग प्रेस येथून सांडपाणी थेट पंचगंगा नदीत जाते. याची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी प्राधान्याने करायला पाहिजे; पण हे झाकून ठेवून दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थानिक अधिकाऱ्यांनी दाखवल्याचे उघड झाले आहे.

दीर्घ म्हणजे किती ?पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येऊन १२ वर्षे झाली. १२ वर्षांतील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ‘दीर्घकालीन उपाययोजना’ सुरू आहेत. म्हणजे इतक्या वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण करता आली नाही, ही नामुष्की उघड झाली आहे. ‘दीर्घकालीन’ म्हणजे किती, प्रदूषणामुळे मनुष्यहानी झाल्यावरच उपाययोजना पूर्ण होणार का ? हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे.

विभागीय आयुक्त, प्रदूषण करणाऱ्या कितीजणांवर कारवाई केली, कारवाई नसेल तर का केली नाही याचा जाब विचारणे, कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांवर जागीच कारवाई करणे, हे न करता मोघमपणे कारवाई करा, असे सांगून निघून गेले. बारा वर्षांपासून हेच सुरू आहे. नदीत प्रदूषित पाणी मिसळण्याची ठिकाणे दाखवणे अपेक्षित होते. तसेही झालेले नाही. - दिलीप देसाई, याचिकाकर्ते, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण