शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ‘केवायसी’ ठरतेय डोकेदुखी, ‘आधार’ला मोबाईल लिंक नसल्याने अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 11:50 IST

मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

राजाराम लोंढेकोल्हापूर : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागात सर्व्हरमुळे माहिती भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यातच आधारकार्डला मोबाईल लिंक असणे बंधनकारक असल्याने अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘केवायसी’ डोकेदुखी ठरत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रुपये चार महिन्यांचा हप्ता येतो. वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी ५ लाख ५९ हजार ८३७ शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टलवरुन नोंदणी झाली आहे.

पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

त्यातही आधारकार्डला संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल लिंक करायचा म्हटला तर तालुक्यात एक-दोन ठिकाणीच ही सोय असते. त्यासाठीही तीन-चार दिवस जात असल्याने ‘केवायसी’ पूर्तता शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

मुदतवाढीची मागणी

सरकारने ‘केवायसी’ पूर्ततेसाठी १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, सर्व्हरमधील अडचणी आणि आधारला मोबाईल लिंकसाठी लागणारा वेळ पाहता, एवढ्या कालावधीत पूर्तता करणे अशक्य आहे. त्यासाठी मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी स्वत: करु शकतात ‘केवायसी’

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील ‘शेतकरी कॉर्नर’ या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थींना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

‘केवायसी’साठी मोजावे लागतात १०० रुपये

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी पंधरा रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, अनेक ठिकाणी ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘केवायसी’ पूर्तता करण्यासाठी अडचणी अनेक आहेत. दिवस-दिवसभर ग्राहक सेवा केंद्रावर थांबूनही काम होत नाही. - रामकृष्ण पाटील (शेतकरी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी