शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांसाठी ‘केवायसी’ ठरतेय डोकेदुखी, ‘आधार’ला मोबाईल लिंक नसल्याने अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 11:50 IST

मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

राजाराम लोंढेकोल्हापूर : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागात सर्व्हरमुळे माहिती भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यातच आधारकार्डला मोबाईल लिंक असणे बंधनकारक असल्याने अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘केवायसी’ डोकेदुखी ठरत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रुपये चार महिन्यांचा हप्ता येतो. वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी ५ लाख ५९ हजार ८३७ शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टलवरुन नोंदणी झाली आहे.

पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

त्यातही आधारकार्डला संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल लिंक करायचा म्हटला तर तालुक्यात एक-दोन ठिकाणीच ही सोय असते. त्यासाठीही तीन-चार दिवस जात असल्याने ‘केवायसी’ पूर्तता शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

मुदतवाढीची मागणी

सरकारने ‘केवायसी’ पूर्ततेसाठी १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, सर्व्हरमधील अडचणी आणि आधारला मोबाईल लिंकसाठी लागणारा वेळ पाहता, एवढ्या कालावधीत पूर्तता करणे अशक्य आहे. त्यासाठी मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी स्वत: करु शकतात ‘केवायसी’

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील ‘शेतकरी कॉर्नर’ या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थींना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

‘केवायसी’साठी मोजावे लागतात १०० रुपये

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी पंधरा रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, अनेक ठिकाणी ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘केवायसी’ पूर्तता करण्यासाठी अडचणी अनेक आहेत. दिवस-दिवसभर ग्राहक सेवा केंद्रावर थांबूनही काम होत नाही. - रामकृष्ण पाटील (शेतकरी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी