शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतकऱ्यांसाठी ‘केवायसी’ ठरतेय डोकेदुखी, ‘आधार’ला मोबाईल लिंक नसल्याने अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 11:50 IST

मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

राजाराम लोंढेकोल्हापूर : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागात सर्व्हरमुळे माहिती भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यातच आधारकार्डला मोबाईल लिंक असणे बंधनकारक असल्याने अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘केवायसी’ डोकेदुखी ठरत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रुपये चार महिन्यांचा हप्ता येतो. वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी ५ लाख ५९ हजार ८३७ शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टलवरुन नोंदणी झाली आहे.

पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

त्यातही आधारकार्डला संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल लिंक करायचा म्हटला तर तालुक्यात एक-दोन ठिकाणीच ही सोय असते. त्यासाठीही तीन-चार दिवस जात असल्याने ‘केवायसी’ पूर्तता शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

मुदतवाढीची मागणी

सरकारने ‘केवायसी’ पूर्ततेसाठी १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, सर्व्हरमधील अडचणी आणि आधारला मोबाईल लिंकसाठी लागणारा वेळ पाहता, एवढ्या कालावधीत पूर्तता करणे अशक्य आहे. त्यासाठी मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी स्वत: करु शकतात ‘केवायसी’

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील ‘शेतकरी कॉर्नर’ या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थींना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

‘केवायसी’साठी मोजावे लागतात १०० रुपये

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी पंधरा रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, अनेक ठिकाणी ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘केवायसी’ पूर्तता करण्यासाठी अडचणी अनेक आहेत. दिवस-दिवसभर ग्राहक सेवा केंद्रावर थांबूनही काम होत नाही. - रामकृष्ण पाटील (शेतकरी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी