शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेला अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:16 IST

अपात्र कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कागल येथील हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक बाबगोंड पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय उपनिबंधक प्रदीप बरगे यांना दिले. शेतकऱ्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेला अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्या: बाबगोंड पाटील यांच्या शिष्टमंडळाची मागणी : विभागीय उपनिबंधकांना निवेदन

कोल्हापूर : अपात्र कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कागल येथील हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक बाबगोंड पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय उपनिबंधक प्रदीप बरगे यांना दिले. शेतकऱ्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या निवेदनाची प्रत न्यू शाहूपुरी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक कृष्णा ठाकरे यांनाही देण्यात आली. सन २००७ व २००८ साली केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले आहे. देशभरातील सर्व शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळाला; परंतु जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे हे सर्व शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत.

यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावे दाखल केले. या दाव्यांपैकी फेरयाचिकेची सुनावणी होऊन न्यायालयाने दाव्यातील सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवीत त्यांचा कर्जपुरवठा सुरू करावा, असा महत्त्वपूर्ण निकाल ३० जानेवारी २०१७ ला दिला. या आदेशाविरुद्ध ‘नाबार्ड’ने सर्वाेच्च न्यायालयात दावा दाखल केला.

याची सुनावणी २८आॅगस्ट २०१७ रोजी होऊन मूळ दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांची थकीत रक्कम १० लाख रुपये इतकी आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असा अंतरिम आदेश दिला आहे.

हा आदेश होऊन आठ महिने झाले तरी जिल्हा बॅँकेने सदर शेतकऱ्यांना अजूनही कर्जपुरवठा सुरू केलेला नाही. जिल्हा बॅँक प्रशासनाला निवेदन देऊनही यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बॅँकेला कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा सनदशीर मार्गाने जनआंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.शिष्टमंडळात यशवंत संकपाळ, लक्ष्मण व्हन्नुरे, कुतबुद्दीन नदाफ यांच्यासह शेतकºयांचा समावेश होता.

नाव ‘नाबार्ड’चं अन् स्वार्थ निवडणुकीचानाबार्ड पतपुरवठा करू देत नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असे कारण सांगणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पतपुरवठा करून निवडणुकीचा स्वार्थ साधायचा आहे, असा टोला जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता बाबगोंड पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर