शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

शेतकरी कायद्याबाबत विरोधकांची दुटप्पी भूमिका : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे कृषी विधेयक शेतकरी हितासाठी मांडण्यात येत असतानाच विविध पक्ष त्याला विरोध करीत आहेत. वास्तविक स्वामीनाथन् ...

रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे कृषी विधेयक शेतकरी हितासाठी मांडण्यात येत असतानाच विविध पक्ष त्याला विरोध करीत आहेत. वास्तविक स्वामीनाथन् शिफारशीवर मोदी सरकारने काम केले आहे. या समितीच्या शिफारशी लागू केल्या तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, विविध पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. मूळ विचारधारा सोडून त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, महिला जिल्हा उपाध्यक्षा ऐश्वर्या जठार, शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेवक उमेश कुळकर्णी, प्रभारी विजय सालीम, आदी उपस्थित होते.

कंत्राटी शेती, लॅण्ड लिजिंग, मॉडेल एपीएमसी कायदा महाराष्ट्रात झाला. १३ वर्षांपूर्वी हे कायदे करण्यात आले असून, तो कायदा केंद्राने जसाच्या तसा राबविण्याचे धोरण अवलंबले असतानाच त्याला विरोध केला जात आहे. राज्यात खासगी बाजार समिती कार्यरत असताना केंद्राने आणलेल्या विधेयकाला विरोध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. बाजार समित्या सुधारण्यासाठी आग्रही आहेत. आंदोलनात सहभागी द्रमुक, आपचे अरविंद केजरीवाल, अकाली दल, समाजवादी पक्ष, तृणमूल तसेच शिवसेना, डावे पक्ष या सर्वांची सुरुवातीची भूमिका व आताची भूमिका यामध्ये फरक आहे. मूळ विचारधारा सोडून त्यांनी दुट्प्पी भूमिका अवलंबली आहे. विरोधासाठी विरोध करून राजकारण करीत आहेत. वास्तविक शेतकरी अन्नदाता असल्याने त्याच्या हितार्थ सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहे. त्यांच्याशी चांगल्या प्रकारे चर्चा होऊन निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.