शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कायद्याबाबत विरोधकांची दुटप्पी भूमिका : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे कृषी विधेयक शेतकरी हितासाठी मांडण्यात येत असतानाच विविध पक्ष त्याला विरोध करीत आहेत. वास्तविक स्वामीनाथन् ...

रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे कृषी विधेयक शेतकरी हितासाठी मांडण्यात येत असतानाच विविध पक्ष त्याला विरोध करीत आहेत. वास्तविक स्वामीनाथन् शिफारशीवर मोदी सरकारने काम केले आहे. या समितीच्या शिफारशी लागू केल्या तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, विविध पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. मूळ विचारधारा सोडून त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, महिला जिल्हा उपाध्यक्षा ऐश्वर्या जठार, शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेवक उमेश कुळकर्णी, प्रभारी विजय सालीम, आदी उपस्थित होते.

कंत्राटी शेती, लॅण्ड लिजिंग, मॉडेल एपीएमसी कायदा महाराष्ट्रात झाला. १३ वर्षांपूर्वी हे कायदे करण्यात आले असून, तो कायदा केंद्राने जसाच्या तसा राबविण्याचे धोरण अवलंबले असतानाच त्याला विरोध केला जात आहे. राज्यात खासगी बाजार समिती कार्यरत असताना केंद्राने आणलेल्या विधेयकाला विरोध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. बाजार समित्या सुधारण्यासाठी आग्रही आहेत. आंदोलनात सहभागी द्रमुक, आपचे अरविंद केजरीवाल, अकाली दल, समाजवादी पक्ष, तृणमूल तसेच शिवसेना, डावे पक्ष या सर्वांची सुरुवातीची भूमिका व आताची भूमिका यामध्ये फरक आहे. मूळ विचारधारा सोडून त्यांनी दुट्प्पी भूमिका अवलंबली आहे. विरोधासाठी विरोध करून राजकारण करीत आहेत. वास्तविक शेतकरी अन्नदाता असल्याने त्याच्या हितार्थ सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहे. त्यांच्याशी चांगल्या प्रकारे चर्चा होऊन निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.