शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बेळगावच्या नामांतरास विरोध

By admin | Updated: February 16, 2015 00:20 IST

शट्टीहळ्ळीतील साहित्य संमेलनात ठराव : संकटे थोपविण्याची ताकद साहित्यात : काळे

नेसरी : लेखक साहित्यातून खऱ्या माणसाचा शोध घेत असतो. प्रसूतीच्या वेदनेपेक्षाही गरिबीच्या वेदना खूप असतात. चारही बाजूंनी येणाऱ्या संकटांना थोपविण्याची ताकद साहित्यात दडली आहे. तेव्हा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक वामन काळे यांनी दिला. सीमाभागातील शट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील दुसऱ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जि. प.च्या माजी सदस्या अंजना रेडेकर, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पिराजी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या संमेलनात बेळगावच्या नामांतरास विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. बाळासो कालकुंद्रीकर यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. लेझीम, झांजपथक, धनगरी ढोलांच्या निनादात दिंडी काढण्यात आली. यानंतर बाबासाहेब कुपेकर साहित्यनगरीचे उद्घाटन एम. टी. कळविकट्टे यांच्या हस्ते, तर व्यासपीठाचे उद्घाटन उद्योजक शिवाजीराव कळविकट्टे यांच्या हस्ते झाले. लेखक वामन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन संमेलनास प्रारंभ झाला. अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. विठ्ठलराव भांदुर्गे व डॉ. शशिकला भांदुर्गे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात कविसंमेलन झाले. प्रा. डॉ. चंद्रशेखर पोतदार, इंद्रजित घुर्ले, राजन कळविकट्टीकर, यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिसऱ्या सत्रात चन्नमा विद्यापीठ बेळगावच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी आजचा माणूस माणसांपासून हरवत चालला आहे या विषयावर मत मांडले. चौथ्या सत्रात नागठाण्याचे हिम्मत पाटील यांनी ‘माती’ या कथेद्वारे ग्रामीण स्त्रियांच्या व्यथा, वेदना व चीड मांडली, तर बंडूची मुंज या विनोदी कथेद्वारे हशा पिकविला.संमेलनातील ठरावराज्य पुनर्रचनेत बहुभाषिक ८६५ खेडी कर्नाटकात डांबली गेली. मात्र, महाराष्ट्राने दाखल केलेला न्यायालयातील दावा महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून, न्यायालयाने खेडे हे घटक भाषिक, बहुसंख्य, भौगोलिक संलग्नता व लोकेच्छा या चतु:सूत्रीनुसार प्रश्न सोडवावा.साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.मराठी जनतेला कर्नाटक शासनाने भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सर्व शासकीय परिपत्रके, कागदपत्रे मराठी भाषेतून द्यावीत.मराठी संस्कृती जपलेल्या बेळगावच्या नामांतरास विरोध.