शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

बेळगावच्या नामांतरास विरोध

By admin | Updated: February 16, 2015 00:20 IST

शट्टीहळ्ळीतील साहित्य संमेलनात ठराव : संकटे थोपविण्याची ताकद साहित्यात : काळे

नेसरी : लेखक साहित्यातून खऱ्या माणसाचा शोध घेत असतो. प्रसूतीच्या वेदनेपेक्षाही गरिबीच्या वेदना खूप असतात. चारही बाजूंनी येणाऱ्या संकटांना थोपविण्याची ताकद साहित्यात दडली आहे. तेव्हा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक वामन काळे यांनी दिला. सीमाभागातील शट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील दुसऱ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जि. प.च्या माजी सदस्या अंजना रेडेकर, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पिराजी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या संमेलनात बेळगावच्या नामांतरास विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. बाळासो कालकुंद्रीकर यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. लेझीम, झांजपथक, धनगरी ढोलांच्या निनादात दिंडी काढण्यात आली. यानंतर बाबासाहेब कुपेकर साहित्यनगरीचे उद्घाटन एम. टी. कळविकट्टे यांच्या हस्ते, तर व्यासपीठाचे उद्घाटन उद्योजक शिवाजीराव कळविकट्टे यांच्या हस्ते झाले. लेखक वामन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन संमेलनास प्रारंभ झाला. अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. विठ्ठलराव भांदुर्गे व डॉ. शशिकला भांदुर्गे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात कविसंमेलन झाले. प्रा. डॉ. चंद्रशेखर पोतदार, इंद्रजित घुर्ले, राजन कळविकट्टीकर, यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिसऱ्या सत्रात चन्नमा विद्यापीठ बेळगावच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी आजचा माणूस माणसांपासून हरवत चालला आहे या विषयावर मत मांडले. चौथ्या सत्रात नागठाण्याचे हिम्मत पाटील यांनी ‘माती’ या कथेद्वारे ग्रामीण स्त्रियांच्या व्यथा, वेदना व चीड मांडली, तर बंडूची मुंज या विनोदी कथेद्वारे हशा पिकविला.संमेलनातील ठरावराज्य पुनर्रचनेत बहुभाषिक ८६५ खेडी कर्नाटकात डांबली गेली. मात्र, महाराष्ट्राने दाखल केलेला न्यायालयातील दावा महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून, न्यायालयाने खेडे हे घटक भाषिक, बहुसंख्य, भौगोलिक संलग्नता व लोकेच्छा या चतु:सूत्रीनुसार प्रश्न सोडवावा.साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.मराठी जनतेला कर्नाटक शासनाने भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सर्व शासकीय परिपत्रके, कागदपत्रे मराठी भाषेतून द्यावीत.मराठी संस्कृती जपलेल्या बेळगावच्या नामांतरास विरोध.