शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विरोधकांनी आता राजकारण सोडावे, निकालानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:37 IST

जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ठळक मुद्देविरोधकांनी आता राजकारण सोडावे : चंद्रकांत पाटीलजळगाव, सांगलीच्या निकालानंतर प्रतिक्रिया

कोल्हापूर : जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.या दोन्ही निकालांमुळे खुशीत असलेले पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या पोटनिवडणुकीपर्यंत जेवढ्या निवडणुका लागल्या त्या त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता यावेळी नक्की भाजप हरणार असे ओरडत राहिली; परंतु लोकांचा भाजपवर अजूनही विश्वास आहे. ही कुणाचीही जहागिरी नाही. त्यांचीही नाही आणि आमचीही नाही. काम करणाऱ्यांची आहे हे यातून स्पष्ट झाले आहे.सर्वत्रच भाजपविरोधी वातावरण असल्याचा भास निर्माण केला गेला; मात्र आमचे सरकार काम करत आहे. त्यांना आणखी वेळ द्यायला हवा अशीच लोकांची भावना असल्याने त्यांनी हा विश्वास दाखवल्याने या दोन्ही शहरातील नागरिकांचे मी आभार मानतो.

आंदोलकांनीच नेत्यांना एकत्र आणावंठिकठिकाणी आंदोलन चालू आहे; त्यामुळे नेमकी कुणाशी चर्चा करणार असा प्रश्न विचारला असता मंत्री पाटील म्हणाले, आम्ही नेत्यांना एकत्र करायला गेलो तर अंगावर येईल. त्यापेक्षा आंदोलकांनीच नेत्यांना आता एकत्र आणले पाहिजे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आंदोलक नेत्यांनी याचा विचार करावा.गेल्यावेळेसारखी फसवणूक होण्याची नेत्यांना भीती वाटते, असे सांगितले असता पाटील म्हणाले, फसवणूक कशी होईल. अंमलबजावणीसाठी एकत्रच ताकद लावू. या सगळ्यातील त्रुटी आम्ही दूर करत आहोत; त्यामुळे तहात हरणे वगैरे बोलण्याची गरज नाही. आम्ही ‘आॅन टेबल’ सगळी प्रक्रिया मांडतो. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक