शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 12:14 IST

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

ठळक मुद्देसभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेठाकरे विधानभवनात पाठवतातराणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळसिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे मात्र यापुढे ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तीच तीच कॅसेट वाजवण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. मातोश्रीवरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुमच्या पक्षाची बांधणी करा, आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.सर्व प्रचारमोहिमा कोकणातून सुरू करणा-या राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला. कॉंग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी शब्द दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.

सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेकोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले. परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू असे दुधवडकर म्हणाले.

ठाकरे विधानभवनात पाठवतातउद्धव ठाकरे यांनी विधानभवन कधी पाहिले का असे नारायण विचारतात. पण ठाकरे विधानभवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवतात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच हा मिल कामगाराचा मुलगा बेस्टचा अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले, असे दुधवडकर म्हणाले.

राणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळराणे यांचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. यांना शिवसेनेने घेतले नाही, कॉंग्रेसवाले कंटाळले. म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार कारण यांना शब्द देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाच्या आमदारकीची काळजी आहे. मात्र यांच्यासोबत शिवसेना सोडणा-यांची तेवढी काळजी यांनी केली, असा सवाल आमदार नाईक यांनी यावेळी उपस्थित केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे ख-या अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.

सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपवणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांनी आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणा-या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे