शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 12:14 IST

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

ठळक मुद्देसभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेठाकरे विधानभवनात पाठवतातराणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळसिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे मात्र यापुढे ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तीच तीच कॅसेट वाजवण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. मातोश्रीवरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुमच्या पक्षाची बांधणी करा, आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.सर्व प्रचारमोहिमा कोकणातून सुरू करणा-या राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला. कॉंग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी शब्द दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.

सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेकोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले. परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू असे दुधवडकर म्हणाले.

ठाकरे विधानभवनात पाठवतातउद्धव ठाकरे यांनी विधानभवन कधी पाहिले का असे नारायण विचारतात. पण ठाकरे विधानभवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवतात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच हा मिल कामगाराचा मुलगा बेस्टचा अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले, असे दुधवडकर म्हणाले.

राणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळराणे यांचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. यांना शिवसेनेने घेतले नाही, कॉंग्रेसवाले कंटाळले. म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार कारण यांना शब्द देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाच्या आमदारकीची काळजी आहे. मात्र यांच्यासोबत शिवसेना सोडणा-यांची तेवढी काळजी यांनी केली, असा सवाल आमदार नाईक यांनी यावेळी उपस्थित केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे ख-या अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.

सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपवणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांनी आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणा-या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे