शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 12:14 IST

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

ठळक मुद्देसभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेठाकरे विधानभवनात पाठवतातराणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळसिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे मात्र यापुढे ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तीच तीच कॅसेट वाजवण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. मातोश्रीवरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुमच्या पक्षाची बांधणी करा, आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.सर्व प्रचारमोहिमा कोकणातून सुरू करणा-या राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला. कॉंग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी शब्द दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.

सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेकोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले. परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू असे दुधवडकर म्हणाले.

ठाकरे विधानभवनात पाठवतातउद्धव ठाकरे यांनी विधानभवन कधी पाहिले का असे नारायण विचारतात. पण ठाकरे विधानभवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवतात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच हा मिल कामगाराचा मुलगा बेस्टचा अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले, असे दुधवडकर म्हणाले.

राणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळराणे यांचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. यांना शिवसेनेने घेतले नाही, कॉंग्रेसवाले कंटाळले. म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार कारण यांना शब्द देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाच्या आमदारकीची काळजी आहे. मात्र यांच्यासोबत शिवसेना सोडणा-यांची तेवढी काळजी यांनी केली, असा सवाल आमदार नाईक यांनी यावेळी उपस्थित केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे ख-या अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.

सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपवणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांनी आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणा-या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे