शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:07 IST

यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मोठा अडथळा दसरा-दिवाळीनंतरच हंगाम वेग घेणार

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.साधारपणे मंत्री समिती १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचा दरवर्षी आग्रह धरते; पण तो प्रत्यक्षात येत नसल्याने यावर्षी तो १५ दिवसांनी पुढे धरण्यात आला आहे. पुणे, नगर, सोलापूर, मराठवाड्यात हा मुहूर्त ठीक आहे; पण कोल्हापूर, सांगली या ऊसपट्ट्यात या मुहूर्ताला कारखान्याची धुराडी पेटूच शकत नाहीत. या काळात परतीचा पाऊस सुरू असतो.

यावर्षी दसरा २५ ऑक्टोबरला आहे, तर दिवाळी १६ नोव्हेंबरला संपते. दसरा झाल्यावरच हंगामाची तयारी सुरू होते. १ नोव्हेंबरपासून मजुरांना आणायचे म्हटले त्यांना आणेपर्यंत दिवाळी सुरू होते. त्यामुळे दसऱ्यानंतर हंगाम सुरू झाला तरी गती घ्यायला दिवाळी संपण्याची वाट तोडणी मजूर पाहतात.उसाचे क्षेत्र वाढलेयंदा अनुकूल हवामानामुळे ऊस पीक जोमदार आले आहे. मुबलक पाण्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर निव्वळ लागण; तर एक लाख हेक्टर हे खोडव्याचे क्षेत्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० हजार हेक्टरनी उसाचे क्षेत्र वाढले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६० मेट्रिक टन ऊस गाळपास येईल आणि १०० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.हंगाम किमान १३०, तर कमाल १६० दिवसांचायंदा उसाची मुबलक उपलब्धता असल्याने साखर कारखान्यांचा उसाचा दुष्काळ संपणार आहे. हंगाम किमान १३०, तर कमाल १६० ते १८० दिवसही चालेल, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी १०० दिवसांचा हंगाम गाठताना कारखान्यांची दमछाक झाली होती. या वर्षी ती कसर भरून निघणार आहे.आंदोलन दरासाठी नव्हे; तर टप्पा टाळण्यासाठीगळीत हंगामाचा सरकारी मुहूर्त निघाला तरी प्रत्यक्ष धुराडी कधी पेटणार हे शेतकरी संघटनेच्याच हातात असते. गेली १७ वर्षे हेच गणित जिल्ह्यात राहिले आहे. एफआरपीच किमान तीन हजार रुपये टनावर दराची उत्सुकता संपली असली तरी ती किती टप्प्यात यावरून मात्र रान पेटणार आहे. दरवर्षी स्वाभिमानी हे रान पेटवत होती; पण यावर्षी स्वाभिमानी सत्तेत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे; पण त्यांची जागा घेण्यासाठी विरोधी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांनी आतापासून पेरणी सुरू केल्याने आंदोलनाची धग कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांची परीक्षा पाहणारा ठरणारा आहे. उसाची मुबलक उपलब्धता ही जमेची बाजू असली तरी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, एफआरपी भागवण्याइतपत ऐपत तयार करण्यासाठी थकहमीचा आरबीआयकडून तयार झालेला गुंता सरकारने तातडीने सोडवायला हवा. अन्यथा कारखानेच सुरू होऊ शकले नाहीत तर शिल्लक उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.- विजय औताडे, माजी कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अभ्यासक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर