शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:07 IST

यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मोठा अडथळा दसरा-दिवाळीनंतरच हंगाम वेग घेणार

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.साधारपणे मंत्री समिती १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचा दरवर्षी आग्रह धरते; पण तो प्रत्यक्षात येत नसल्याने यावर्षी तो १५ दिवसांनी पुढे धरण्यात आला आहे. पुणे, नगर, सोलापूर, मराठवाड्यात हा मुहूर्त ठीक आहे; पण कोल्हापूर, सांगली या ऊसपट्ट्यात या मुहूर्ताला कारखान्याची धुराडी पेटूच शकत नाहीत. या काळात परतीचा पाऊस सुरू असतो.

यावर्षी दसरा २५ ऑक्टोबरला आहे, तर दिवाळी १६ नोव्हेंबरला संपते. दसरा झाल्यावरच हंगामाची तयारी सुरू होते. १ नोव्हेंबरपासून मजुरांना आणायचे म्हटले त्यांना आणेपर्यंत दिवाळी सुरू होते. त्यामुळे दसऱ्यानंतर हंगाम सुरू झाला तरी गती घ्यायला दिवाळी संपण्याची वाट तोडणी मजूर पाहतात.उसाचे क्षेत्र वाढलेयंदा अनुकूल हवामानामुळे ऊस पीक जोमदार आले आहे. मुबलक पाण्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर निव्वळ लागण; तर एक लाख हेक्टर हे खोडव्याचे क्षेत्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० हजार हेक्टरनी उसाचे क्षेत्र वाढले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६० मेट्रिक टन ऊस गाळपास येईल आणि १०० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.हंगाम किमान १३०, तर कमाल १६० दिवसांचायंदा उसाची मुबलक उपलब्धता असल्याने साखर कारखान्यांचा उसाचा दुष्काळ संपणार आहे. हंगाम किमान १३०, तर कमाल १६० ते १८० दिवसही चालेल, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी १०० दिवसांचा हंगाम गाठताना कारखान्यांची दमछाक झाली होती. या वर्षी ती कसर भरून निघणार आहे.आंदोलन दरासाठी नव्हे; तर टप्पा टाळण्यासाठीगळीत हंगामाचा सरकारी मुहूर्त निघाला तरी प्रत्यक्ष धुराडी कधी पेटणार हे शेतकरी संघटनेच्याच हातात असते. गेली १७ वर्षे हेच गणित जिल्ह्यात राहिले आहे. एफआरपीच किमान तीन हजार रुपये टनावर दराची उत्सुकता संपली असली तरी ती किती टप्प्यात यावरून मात्र रान पेटणार आहे. दरवर्षी स्वाभिमानी हे रान पेटवत होती; पण यावर्षी स्वाभिमानी सत्तेत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे; पण त्यांची जागा घेण्यासाठी विरोधी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांनी आतापासून पेरणी सुरू केल्याने आंदोलनाची धग कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांची परीक्षा पाहणारा ठरणारा आहे. उसाची मुबलक उपलब्धता ही जमेची बाजू असली तरी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, एफआरपी भागवण्याइतपत ऐपत तयार करण्यासाठी थकहमीचा आरबीआयकडून तयार झालेला गुंता सरकारने तातडीने सोडवायला हवा. अन्यथा कारखानेच सुरू होऊ शकले नाहीत तर शिल्लक उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.- विजय औताडे, माजी कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अभ्यासक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर