शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्त्वाखालीच मराठा आरक्षण लढ्याला यश मिळेल  : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:36 IST

Sambhaji Raje Chhatrapati HasanMusrif Kolhapur : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पुन्हा मोर्चे काढावेत, आंदोलन करावे, लोकांना उठवावे असे चंद्रकांतदादांना वाटते.परंतु,कोरोना महामारीत संभाजीराजेंनी घेतलेली संयमाची भूमिकाच योग्य आहे.त्यांच्या संयमी नेतृत्त्वाखालीच आरक्षणाच्या लढ्याला यश येईल,असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देगडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा विश्र्वास चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा समाचार

गडहिंग्लज : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पुन्हा मोर्चे काढावेत, आंदोलन करावे, लोकांना उठवावे असे चंद्रकांतदादांना वाटते.परंतु,कोरोना महामारीत संभाजीराजेंनी घेतलेली संयमाची भूमिकाच योग्य आहे.त्यांच्या संयमी नेतृत्त्वाखालीच आरक्षणाच्या लढ्याला यश येईल,असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केला.शुक्रवारी (११) कोल्हापूर येथील एका कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करताय कां? असा थेट सवाल खासदार संभाजीराजे यांना विचारला होता.याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांच्या 'त्या' वक्तव्याचा खरपूस समाचारच घेतला.गडहिंग्लज उपविभागातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीसाठी मुश्रीफ गडहिंग्लजला आले होते.आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले,चंद्रकांतदादांना नेमकं काय झालयं माहित नाही.राज्याची सत्ता गेल्यामुळेच ते अस्वस्थ आहेत. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लोकांचे काय हाल झाले याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळेच ते संयमाने जात आहेत. सध्या अशा संयमी नेतृत्वाची गरज आहे.मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीने फेरविचार याचिकेबाबत पर्याय दिला आहे.त्यादृष्टीने राज्य सरकारची तयारी सुरु आहे.महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची सरकारची तयारी आहे.त्यामुळेच संभाजीराजेंचाही आघाडी सरकारवर विश्र्वास आहे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापूरात चर्चा.. !सोमवारी(१४) उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासाठी कोल्हापूरला येत आहेत.त्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे.आरक्षणात घटनात्मक पेच निर्माण झाला असला तरी मराठा बांधवांचे जे छोटे- छोटे प्रश्न,मागण्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी बैठकीत प्रयत्न केला जाईल,असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर