शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

..तरच गावे स्वावलंबी होतील अन् शहरे सुरक्षित राहतील, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:33 IST

ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा

आजरा : गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्या. त्यामुळे गावे स्वावलंबी होतील व शहरे सुरक्षित राहतील. तणनाशक व खतांच्या अतिवापरामुळे दूषित माती व पाणी झाले असून त्याचा विकास व पर्यावरणावर परिणाम होत आहे. हे थांबवले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्रीप्राप्त सरपंच पोपटराव पवार यांनी केले.आजरा तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ काकडे होते.लोकशाही प्रक्रियेने गावे बिघडण्याऐवजी गावांना संघटित करा. ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा. तालुक्यातील एका गावाने केले तर मोठी चळवळ तयार होते. या चळवळीतूनच गावाला समृद्ध करा. राज्यातील यशस्वी योजना दिल्लीने स्वीकारल्या आहेत. राज्य व केंद्राकडून मिळालेले अनुदानात ग्रामस्थांचा २५ टक्के हिस्सा असलाच पाहिजे असेही पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले.काकडे म्हणाले, प्रत्येक सरपंचाने गावातील माती व पाण्यासाठी काम करावे. तरच गावे विषमुक्त होवून आर्थिक उन्नती होईल.यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास मारूती मोरे, मुकुंद देसाई, तहसिलदार विकास अहिर, राजू पोतनीस, संतोष बेलवाडे, लक्ष्मण गुडुळकर, शंकर कुराडे, अमोल बांबरे, वैशाली गुरव, निवृत्ती कांबळे आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. जी. एम. पाटील यांनी स्वागत केले. संभाजी सरदेसाई यांनी प्रस्तावित केले.आदर्श गाव व निधीआजरा तालुक्यातील दोन गावे आदर्श करण्यासाठी आम्हाला द्या. आमची टीम येवून गावसभा घेवून मार्गदर्शन करेल. शासनाकडून आदर्श गाव जाहीर झाले की ८ कोटींचा निधी मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.जास्त काम जास्त मतांनी पराभूतसरपंचांनी गावात सर्वात जास्त काम करतो तोच पुढल्या निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी पराभूत होतो. हा महाराष्ट्रातील अनेक गावाचा इतिहास आहे. कारण लोकांची विकासाकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. त्यामुळे कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणेसाठी प्रयत्न करा. आपल्याला लोक पुन्हा निवडून देतील असे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRural Developmentग्रामीण विकास