शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

..तरच गावे स्वावलंबी होतील अन् शहरे सुरक्षित राहतील, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:33 IST

ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा

आजरा : गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्या. त्यामुळे गावे स्वावलंबी होतील व शहरे सुरक्षित राहतील. तणनाशक व खतांच्या अतिवापरामुळे दूषित माती व पाणी झाले असून त्याचा विकास व पर्यावरणावर परिणाम होत आहे. हे थांबवले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्रीप्राप्त सरपंच पोपटराव पवार यांनी केले.आजरा तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ काकडे होते.लोकशाही प्रक्रियेने गावे बिघडण्याऐवजी गावांना संघटित करा. ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा. तालुक्यातील एका गावाने केले तर मोठी चळवळ तयार होते. या चळवळीतूनच गावाला समृद्ध करा. राज्यातील यशस्वी योजना दिल्लीने स्वीकारल्या आहेत. राज्य व केंद्राकडून मिळालेले अनुदानात ग्रामस्थांचा २५ टक्के हिस्सा असलाच पाहिजे असेही पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले.काकडे म्हणाले, प्रत्येक सरपंचाने गावातील माती व पाण्यासाठी काम करावे. तरच गावे विषमुक्त होवून आर्थिक उन्नती होईल.यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास मारूती मोरे, मुकुंद देसाई, तहसिलदार विकास अहिर, राजू पोतनीस, संतोष बेलवाडे, लक्ष्मण गुडुळकर, शंकर कुराडे, अमोल बांबरे, वैशाली गुरव, निवृत्ती कांबळे आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. जी. एम. पाटील यांनी स्वागत केले. संभाजी सरदेसाई यांनी प्रस्तावित केले.आदर्श गाव व निधीआजरा तालुक्यातील दोन गावे आदर्श करण्यासाठी आम्हाला द्या. आमची टीम येवून गावसभा घेवून मार्गदर्शन करेल. शासनाकडून आदर्श गाव जाहीर झाले की ८ कोटींचा निधी मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.जास्त काम जास्त मतांनी पराभूतसरपंचांनी गावात सर्वात जास्त काम करतो तोच पुढल्या निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी पराभूत होतो. हा महाराष्ट्रातील अनेक गावाचा इतिहास आहे. कारण लोकांची विकासाकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. त्यामुळे कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणेसाठी प्रयत्न करा. आपल्याला लोक पुन्हा निवडून देतील असे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRural Developmentग्रामीण विकास