शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

..तरच गावे स्वावलंबी होतील अन् शहरे सुरक्षित राहतील, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:33 IST

ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा

आजरा : गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्या. त्यामुळे गावे स्वावलंबी होतील व शहरे सुरक्षित राहतील. तणनाशक व खतांच्या अतिवापरामुळे दूषित माती व पाणी झाले असून त्याचा विकास व पर्यावरणावर परिणाम होत आहे. हे थांबवले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्रीप्राप्त सरपंच पोपटराव पवार यांनी केले.आजरा तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ काकडे होते.लोकशाही प्रक्रियेने गावे बिघडण्याऐवजी गावांना संघटित करा. ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा. तालुक्यातील एका गावाने केले तर मोठी चळवळ तयार होते. या चळवळीतूनच गावाला समृद्ध करा. राज्यातील यशस्वी योजना दिल्लीने स्वीकारल्या आहेत. राज्य व केंद्राकडून मिळालेले अनुदानात ग्रामस्थांचा २५ टक्के हिस्सा असलाच पाहिजे असेही पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले.काकडे म्हणाले, प्रत्येक सरपंचाने गावातील माती व पाण्यासाठी काम करावे. तरच गावे विषमुक्त होवून आर्थिक उन्नती होईल.यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास मारूती मोरे, मुकुंद देसाई, तहसिलदार विकास अहिर, राजू पोतनीस, संतोष बेलवाडे, लक्ष्मण गुडुळकर, शंकर कुराडे, अमोल बांबरे, वैशाली गुरव, निवृत्ती कांबळे आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. जी. एम. पाटील यांनी स्वागत केले. संभाजी सरदेसाई यांनी प्रस्तावित केले.आदर्श गाव व निधीआजरा तालुक्यातील दोन गावे आदर्श करण्यासाठी आम्हाला द्या. आमची टीम येवून गावसभा घेवून मार्गदर्शन करेल. शासनाकडून आदर्श गाव जाहीर झाले की ८ कोटींचा निधी मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.जास्त काम जास्त मतांनी पराभूतसरपंचांनी गावात सर्वात जास्त काम करतो तोच पुढल्या निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी पराभूत होतो. हा महाराष्ट्रातील अनेक गावाचा इतिहास आहे. कारण लोकांची विकासाकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. त्यामुळे कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणेसाठी प्रयत्न करा. आपल्याला लोक पुन्हा निवडून देतील असे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRural Developmentग्रामीण विकास