शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलणार

By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST

गडहिंग्लज पालिका : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय

गडहिंग्लज : मे मध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांची मुदत संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन त्याजागी अन्य इच्छुकांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, १५ वर्षांनंतर होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यात्रेच्या नियोजनात व्यत्यय येऊ नये, म्हणून यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलावा, अशी विनंती यात्रा समितीसह प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून केली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांनी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याची सूचना आमदार मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. नगराध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत वेळ जाऊन नागरिक व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलाचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.बैठकीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, नगरपालिकेतील गटनेते रामदास कुराडे, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)पार्किंग जागा, वाहतुकीबाबत बैठकीत चर्चागडहिंग्लज : मे महिन्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राकाळातील दुकानदारांची बैठक व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन, पार्किंगच्या जागा आणि नागरी सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, उपसरपंच वैभव साबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नगरपालिका व पोलिसांनी वाहनतळांची जागा निश्चित करावी. बसगाड्यांसह खासगी वाहनांच्या वाहतुकीबाबतही निश्चित धोरण ठरवावे, अशी सूचना तहसीलदारांनी केली.यात्रेनिमित्त शहरात येणाऱ्या विविध स्टॉलधारकांच्या बैठकीची व्यवस्था पालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे करावी. यात्रेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जागांची निश्चिती करावी, अशी सूचना त्यांनी केली. यात्रेसाठी मागविण्यात येणाऱ्या मिनीबसेसऐवजी गडहिंग्लज शहरातील वाहतुकीच्या डबलडोअरच्या बसगाड्या मागवाव्यात, अशी सूचना करण्यात आली. यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी रिंगरोडवरील जमीनमालक शेतकऱ्यांच्या सहमतीने किमान तात्पुरती वाहतूक सुरू करावी, अशी सूचनादेखील करण्यात आली. बैठकीस नगरअभियंता रमेश पाटील, जलअभियंता जमीर मुश्रीफ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे, आगारप्रमुख सुनील जाधव, यात्रा समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, काशिनाथ देवगोंडा, अमरनाथ घुगरी, सुधीर पाटील, आदींसह विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)