शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘चिकोत्रा’ धरणात अवघे २२ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:49 PM

दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतीची तहान भागविण्यासाठी १८ वर्षांपूर्वी चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेले झुलपेवाडी धरण केवळ दोन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर जाण्यासाठी बांधण्यात आलेला सांडवा (ओव्हरफ्लो गेट) पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला पाहायला मिळतो. तब्बल बारा वर्षांपासून धरणातील पाणी या गेटपर्यंत ...

दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतीची तहान भागविण्यासाठी १८ वर्षांपूर्वी चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेले झुलपेवाडी धरण केवळ दोन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर जाण्यासाठी बांधण्यात आलेला सांडवा (ओव्हरफ्लो गेट) पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला पाहायला मिळतो. तब्बल बारा वर्षांपासून धरणातील पाणी या गेटपर्यंत पोहोचलेलेच नाही. त्यामुळे यंदा तरी हे धरण ओव्हरफ्लो होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या धरणात अवघे २२ टक्के म्हणजेच ३२९ एमसीएफटी पाणीसाठा झाला आहे, तर धरणाच्या पुढे चिकोत्रा नदी काटोकाट वाहत आहे. हा विरोधाभास सहजतेने जाणवतो.चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने कागल तालुक्याच्या दक्षिणेकडे आजरा तालुक्याच्या हद्दीत झुलपेवाडी येथे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची २००५ व २००७ ही दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही.यावर्षीही पावसाचे पडणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाहूनच जात आहे. सध्या चिकोत्रा नदी दुथडी वाहत आहे. मात्र, धरणातील पाणीसाठ्याची पातळी अत्यंत संथगतीने वाढत आहे.जिल्ह्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत, तर मोठी धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत; परंतु चिकोत्रा धरण केवळ २२ टक्क्यांवरच आले आहे. हा महिनाच हक्काचा पाऊस असतो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान करणे आवश्यक आहे. धरणक्षेत्रातून वाया जाणारे पाणी या धरणात वळविण्याची गरज आहे.चिकोत्रा खोºयात आजरा, भुदरगडसह कागलमधील ३५ गावांचा समावेश आहे. या धरणाची क्षमता अवघी दीड टीमसी इतकीच आहे. जर हे पूर्ण क्षमतेने भरले तर ३५ गावांच्या पिण्यासह ५ हजार ६२० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे; परंतु दुर्दैव म्हणजे हे धरण भरतच नाही.दरम्यान, धरणक्षेत्रात गेल्या २४ तासांत १३४ मि.मी. पाऊस पडला असून, आजअखेर ९०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सुरुवातीला धरणात १८० एमसीएफटी पाणी शिल्लक होते, तर आता ३२९ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. म्हणजेच काळम्मावाडी धरणातून दूधगंगेत एकावेळी सोडल्या जाणाºया पाण्याचा निम्माही हा पाणीसाठा नाही. काळम्मावाडीतून एकाचवेळी साधारणत: ५०० एमसीएफटीहून अधिक पाणी नदीपात्रात सोडले जाते....तर आंदोलनाची तीव्रता वाढणारगेल्या दोन महिन्यांपासून किसान सभेच्या माध्यमातून हे धरण पूर्ण क्षमतेने भरावे तसेच नागणवाडी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी विशेष लक्ष देण्याचे अभिवचन दिल्यामुळे हे आंदोलन थांबले आहे; परंतु दिवाळीपर्यंत याबाबत हालचाली न झाल्यास पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याशिवाय येथील जनतेला पर्यायच नाही.पाण्याचा संपर्क नसणारे एकमेव सांडवा गेट..!धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी या धरणाच्या दक्षिण बाजूला वक्राकार सांडवा गेट आहे. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून या गेटपर्यंत पाणीच न गेल्याने हे गेट उघडलेले नाही. या गेटची उघडझाप होत नसल्यामुळे त्याच्यावर गंज चढत आहे. १८ वर्षांत केवळ दोन वेळाच उघडले जाणारे हे एकमेव गेट आहे.