शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

निर्यातबंदीविरोधात मंगळवारी कांदा मार्केट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:12 IST

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनिर्यातबंदीविरोधात मंगळवारी कांदा मार्केट बंदबंदमध्ये सगळे व्यापारी आणि शेतकरी सहभागी होणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले यांनी  पत्रकार परिषदेत दिली.मागील तीन वर्षे कांद्याचे अधिक अधिक उत्पादनामुळे दर पडले. यंदा सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली होती. तथापि सरकारने कांद्याची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला.

केवळ निर्यातबंदी करून सरकार थांबले नाही तर देशांतर्गत कांदा व्यापारावर साठा मर्यादा घातली. घाऊक व्यापाऱ्यांना केवळ ५० टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना १० टन साठा मर्यादा घातली आहे. बांगलादेशात चाललेल्या कांद्याचे ट्रक सात दिवस रोखून धरले.

या निर्णयाने शेतकरी व व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. अगोदरच गेली तीन-चार वर्षे कमी दरामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. कांद्याचे दर थोडे वाढले की लगेच ओरड सुरू होते आणि सरकारही तातडीने दर कमी करण्यासाठी हवे ते निर्णय घेते.

सरकारबरोबरच विरोधी पक्षांनी कांद्याचा मुद्दा राजकारणासाठी वापरला जाऊ नये, असे नरंदे व कोले यांनी सांगितले. मंगळवारच्या मार्केट बंदमध्ये सगळे व्यापारी आणि शेतकरी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुसा देसाई, आदम मुजावर, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :onionकांदाkolhapurकोल्हापूरMarketबाजार