शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींना मिळाला ४८ कोटींचा निधी, गावांचा होणार विकास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:19 IST

२६ जिल्हा परिषदांना निधी नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील १०१५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील पंधराव्या वित्त आयोगातील बंधित निधीचा दुसरा हप्ता अदा करण्यात आला आहे. ही रक्कम ४७ कोटी ७२ लाख दहा हजार रुपये असून ती ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.दोनच दिवसांपूर्वी याबाबत ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढला आहे. एकूण राज्याला १ हजार ८३ कोटी रुपये इतका निधी अदा करण्यात आला आहे. यातील प्रत्येकी १० टक्के रक्कम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी राखीव आहे, तर उर्वरित ८० टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.जिल्ह्यात जरी १०२५ ग्रामपंचायती असल्या तरी दहा ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्यामुळे या ग्रामपंचायतींचा निधी अदा करण्यात आलेला नाही. या निधीतून स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती आणि पेयजल योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यासाठी या निधीतून ५० टक्के निधी वापरणे बंधनकारक आहे. जर यातील एका बाबीची आधी पूर्तता झाली असेल तर उर्वरित निधी दुसऱ्या बाबीसाठी वापरता येणार आहे.

२६ जिल्हा परिषदांना निधी नाहीराज्यातील २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या आणि ६३५ ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वाट्याचा हिस्सा यातून अदा करण्यात आलेला नाही. या सर्व संस्थांना गेल्या वर्षभरापासून निधी मिळालेला नाही. संस्थेवर प्रशासक असल्याचे कारण त्यासाठी सांगण्यात येते.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींना दिलेला निधीतालुका - ग्रामपंचायत - रक्कमकरवीर - ११२- ८ कोटी १८ लाखगडहिंग्लज -८८ - ३ कोटी ३४ लाखराधानगरी - ९७ - ३ कोटी ४७ लाखचंदगड - १०८  - ३ कोटी ७९ लाखपन्हाळा - ११०  - ४ कोटी ४६ लाखआजरा - ७३ - १ कोटी ७८ लाखभुदरगड - ९७  - २ कोटी ६० लाखगगनबावडा - २९  -  ६२ लाख ५२ हजारशाहूवाडी - १०६ - ३ कोटी १५ लाखशिरोळ - ५२ - ५ कोटी ९९ लाखकागल - ८३ - ४ कोटी २० लाखहातकणंगले - ६० -  ७ कोटी ८७ लाखएकूण - १०१५  - ४७ कोटी ७२ लाख १० हजार रुपये 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत