शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय?

By राजाराम लोंढे | Updated: September 7, 2022 12:11 IST

तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय?

कोल्हापूर : केंद्र सरकारची पी. एम. किसान पेन्शन योजनेचे पैसे नको म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनेक वेळा अर्ज करूनही त्यांच्या खात्यावर पैसे यायचे थांबेनात. पात्र शेतकरी हेलपाटे मारत आहेत, त्यांना मात्र पैसे मिळेनात. खुद्द राजू शेट्टी यांनीच ‘पी. एम. किसान’ याेजनेचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

केंद्र सरकारकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. आमदार, खासदारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, सुरुवातीला या निकषांची फारशी माहिती नसल्याने सरसकट सगळ्यांनीच योजनेसाठी अर्ज भरले. त्यानुसार राजू शेट्टी यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले. मात्र, योजनेचे निकष पाहून शेट्टी यांनी पेन्शन बंद करण्यासाठी अर्ज करत दोन वर्षांचे बारा हजार रुपयांचा धनादेश १३ जानेवारी २०२१ रोजी तहसीलदारांकडे दिला तरीही मे २०२२ मध्ये हप्ता जमा झाला.

लोकप्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांनी पेन्शन मिळते, असे असताना या पेन्शन योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी त्यांनी अनेक वेळा लेखी तक्रार करून पुन्हा पैसे जमा होतात. त्यांनी मंगळवारी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे यांची भेट घेऊन पेन्शन योजनेतून अपात्र करण्याची पुन्हा मागणी केली.

केंद्र सरकारची यंत्रणाच ठरतेय कुचकामी

मुळात पेन्शन मंजूर करणे व रद्द करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. स्थानिक चौकशी समितीने अपात्र लाभार्थ्यांची पेन्शन बंद करा, म्हणून अहवाल दिला असतानाही पुन्हा पेन्शन जमा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. मात्र, याचे खापर स्थानिक महसूल यंत्रणेवर फोडले जात आहे.

सहा हप्त्यांचे १२ हजार रुपये आपण परत केलेलेे आहेत तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय हेच कळत नाही. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना