शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय?

By राजाराम लोंढे | Updated: September 7, 2022 12:11 IST

तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय?

कोल्हापूर : केंद्र सरकारची पी. एम. किसान पेन्शन योजनेचे पैसे नको म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनेक वेळा अर्ज करूनही त्यांच्या खात्यावर पैसे यायचे थांबेनात. पात्र शेतकरी हेलपाटे मारत आहेत, त्यांना मात्र पैसे मिळेनात. खुद्द राजू शेट्टी यांनीच ‘पी. एम. किसान’ याेजनेचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

केंद्र सरकारकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. आमदार, खासदारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, सुरुवातीला या निकषांची फारशी माहिती नसल्याने सरसकट सगळ्यांनीच योजनेसाठी अर्ज भरले. त्यानुसार राजू शेट्टी यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले. मात्र, योजनेचे निकष पाहून शेट्टी यांनी पेन्शन बंद करण्यासाठी अर्ज करत दोन वर्षांचे बारा हजार रुपयांचा धनादेश १३ जानेवारी २०२१ रोजी तहसीलदारांकडे दिला तरीही मे २०२२ मध्ये हप्ता जमा झाला.

लोकप्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांनी पेन्शन मिळते, असे असताना या पेन्शन योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी त्यांनी अनेक वेळा लेखी तक्रार करून पुन्हा पैसे जमा होतात. त्यांनी मंगळवारी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे यांची भेट घेऊन पेन्शन योजनेतून अपात्र करण्याची पुन्हा मागणी केली.

केंद्र सरकारची यंत्रणाच ठरतेय कुचकामी

मुळात पेन्शन मंजूर करणे व रद्द करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. स्थानिक चौकशी समितीने अपात्र लाभार्थ्यांची पेन्शन बंद करा, म्हणून अहवाल दिला असतानाही पुन्हा पेन्शन जमा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. मात्र, याचे खापर स्थानिक महसूल यंत्रणेवर फोडले जात आहे.

सहा हप्त्यांचे १२ हजार रुपये आपण परत केलेलेे आहेत तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय हेच कळत नाही. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना