शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

महापूर नियंत्रणासाठी जुनी आरटीडीए सिस्टीम वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 15:55 IST

पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहापूर नियंत्रणासाठी जुन्या यंत्रणेचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर होणारकोल्हापूर-सांगलीकरांना महापुराचा संभाव्य अंदाज बांधणे सोपे

कोल्हापूर : धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम अस्तित्वात असतानाही तिचा म्हणावा तसा वापर होऊ शकला नाही. गेल्या वर्षी आलेल्या प्रलंयकारी महापुरानंतर तिची उपयुक्तता पुन्हा एकदा जाणवू लागल्याने पाटबंधारे विभागाने ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी पुराचा अंदाज बांधणे सोपे होणार आहे.कृष्णा व भीमा खोऱ्यांतील पडणारा पाऊस, धरणांतील पाण्याची पातळी, होणारा पाण्याचा विसर्ग यांतून निर्माण होणारी पूरस्थिती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २०१४ साली जलसंपदा विभागाने आरटीडीए सिस्टीम कार्यान्वित केली. नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाने तयार केलेल्या या यंत्रणेच्या वापरातूनच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्याचे ठरले; पण नेहमीप्रमाणे त्याकडे फारसे बारकाईने पाहिले गेले नाही.

ही उपग्रहाशी संलग्न कार्यप्रणाली असल्याने तिचा महापूरकाळात प्रभावीपणे वापर होऊ शकतो; पण केवळ दुर्लक्षामुळे गेल्या वर्षी धरणांतील विसर्गाचे नियोजन चुकले. त्यातून भीमा-कृष्णा खोऱ्याला महापुराचा जोरदार फटका सहन करावा लागला.

रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा जसा या महापुराला कारणीभूत आहे, तसाच धरणांतील विसर्गही कारणीभूत असल्याचे निरीक्षण महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने नोंदवल्यानंतर ही आटीडीए यंत्रणा नव्याने अभ्यासण्यास सुरुवात झाली आहे.वडनेरे समिती शिफारशीबाबत शासन निर्देशच नाहीतवडनेरे समितीने धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणा असे निर्देश शासनाकडून जलसंपदा विभागाला देणे गरजेचे आहे; पण अहवाल येऊन महिना होत आला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. आता तर पावसाळा सुरू झाला आहे.

लघू प्रकल्प भरून वाहू लागले आहेत, तर मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांत किमान ३० ते ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता वडनेरे समितीच्या शिफारशींची वाट न पाहता आतापर्यंत वापरत असलेल्या यंत्रणेचाच वापर पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटबंधारेच्या सूत्रांनी सांगितले.विसर्गाची माहिती दर १५ मिनिटांनीआरटीडीए सिस्टीमअंतर्गत पाण्याच्या मोजमापासाठी २४९ केंद्रे कार्यान्वित केली असून, १९१ केंद्रांद्वारे पडणाऱ्या पावसाचे मोजमाप होते. पडणारा पाऊस, पाण्याचा विसर्ग यांचा दर १५ मिनिटांनी अहवाल येईल, असे नियोजन यामागे आहे. धरणातून पाणी सोडले की थेट नदीपात्रात येण्यासाठी लागणाऱ्या जवळपास ६ ते १२ तासांच्या अंतरादरम्यान पुढील हालचालींचा वेग वाढवता येतो.यंत्रणा अजून गाफीलगेल्या वर्षीच्या महापुराचा वाईट अनुभव असल्याने यंत्रणा आतापासून सतर्क करणे अपेक्षित होते; पण एकूणच आपत्ती व्यवस्थापन, पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील हालचाली पाहिल्या तर बऱ्यापैकी शांतताच दिसत आहे. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकामची बरीचशी यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती.

रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय मजुरांची पाठवणी, कम्युनिटी किचन, निवारा केंद्रे, संस्थात्मक विलगीकरण कक्ष, आदी ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मूळ कामाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. धरणांच्या सुरक्षिततेचे काम पूर्ण झाले असले तरी इतर किरकोळ दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसkolhapurकोल्हापूर