शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

महापूर नियंत्रणासाठी जुनी आरटीडीए सिस्टीम वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 15:55 IST

पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहापूर नियंत्रणासाठी जुन्या यंत्रणेचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर होणारकोल्हापूर-सांगलीकरांना महापुराचा संभाव्य अंदाज बांधणे सोपे

कोल्हापूर : धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम अस्तित्वात असतानाही तिचा म्हणावा तसा वापर होऊ शकला नाही. गेल्या वर्षी आलेल्या प्रलंयकारी महापुरानंतर तिची उपयुक्तता पुन्हा एकदा जाणवू लागल्याने पाटबंधारे विभागाने ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी पुराचा अंदाज बांधणे सोपे होणार आहे.कृष्णा व भीमा खोऱ्यांतील पडणारा पाऊस, धरणांतील पाण्याची पातळी, होणारा पाण्याचा विसर्ग यांतून निर्माण होणारी पूरस्थिती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २०१४ साली जलसंपदा विभागाने आरटीडीए सिस्टीम कार्यान्वित केली. नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाने तयार केलेल्या या यंत्रणेच्या वापरातूनच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्याचे ठरले; पण नेहमीप्रमाणे त्याकडे फारसे बारकाईने पाहिले गेले नाही.

ही उपग्रहाशी संलग्न कार्यप्रणाली असल्याने तिचा महापूरकाळात प्रभावीपणे वापर होऊ शकतो; पण केवळ दुर्लक्षामुळे गेल्या वर्षी धरणांतील विसर्गाचे नियोजन चुकले. त्यातून भीमा-कृष्णा खोऱ्याला महापुराचा जोरदार फटका सहन करावा लागला.

रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा जसा या महापुराला कारणीभूत आहे, तसाच धरणांतील विसर्गही कारणीभूत असल्याचे निरीक्षण महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने नोंदवल्यानंतर ही आटीडीए यंत्रणा नव्याने अभ्यासण्यास सुरुवात झाली आहे.वडनेरे समिती शिफारशीबाबत शासन निर्देशच नाहीतवडनेरे समितीने धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणा असे निर्देश शासनाकडून जलसंपदा विभागाला देणे गरजेचे आहे; पण अहवाल येऊन महिना होत आला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. आता तर पावसाळा सुरू झाला आहे.

लघू प्रकल्प भरून वाहू लागले आहेत, तर मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांत किमान ३० ते ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता वडनेरे समितीच्या शिफारशींची वाट न पाहता आतापर्यंत वापरत असलेल्या यंत्रणेचाच वापर पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटबंधारेच्या सूत्रांनी सांगितले.विसर्गाची माहिती दर १५ मिनिटांनीआरटीडीए सिस्टीमअंतर्गत पाण्याच्या मोजमापासाठी २४९ केंद्रे कार्यान्वित केली असून, १९१ केंद्रांद्वारे पडणाऱ्या पावसाचे मोजमाप होते. पडणारा पाऊस, पाण्याचा विसर्ग यांचा दर १५ मिनिटांनी अहवाल येईल, असे नियोजन यामागे आहे. धरणातून पाणी सोडले की थेट नदीपात्रात येण्यासाठी लागणाऱ्या जवळपास ६ ते १२ तासांच्या अंतरादरम्यान पुढील हालचालींचा वेग वाढवता येतो.यंत्रणा अजून गाफीलगेल्या वर्षीच्या महापुराचा वाईट अनुभव असल्याने यंत्रणा आतापासून सतर्क करणे अपेक्षित होते; पण एकूणच आपत्ती व्यवस्थापन, पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील हालचाली पाहिल्या तर बऱ्यापैकी शांतताच दिसत आहे. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकामची बरीचशी यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती.

रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय मजुरांची पाठवणी, कम्युनिटी किचन, निवारा केंद्रे, संस्थात्मक विलगीकरण कक्ष, आदी ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मूळ कामाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. धरणांच्या सुरक्षिततेचे काम पूर्ण झाले असले तरी इतर किरकोळ दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसkolhapurकोल्हापूर