शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:30 IST

पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले.

ठळक मुद्देशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता.

भारत चव्हाण कोल्हापूर : कधी-कधी आक्रमकपणा लोकांना आवडत नाही. राजेश क्षीरसागर यांनी जनतेच्या हिताकरिता आक्रमकपणा स्वीकारला; परंतु मूठभर लोकांनी त्याचे भांडवल करीत त्यांच्यावर आरोप केले. क्षीरसागर यांची प्रतिमा अशा आरोपांतून मतदारांपर्यंत पोहोचविण्यात विरोधक यशस्वी झाले. दुसऱ्या बाजूने शिवसेनेतील गद्दारीही त्यांना नडली. पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले.

शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता. कोणी निवडणूक लढवावी, याचे विचारमंथन कॉँग्रेसमध्ये सुरू होते. कोणीच पुढे येईनात. मधुरिमाराजे छत्रपती यांचीही कॉँग्रेस नेत्यांनी मनधरणी केली; परंतु त्यांनीही नकार दिला. त्यामुळे क्षीरसागर हॅट्ट्रिक करतील, याची शक्यता जास्त वाटत होती. कॉँग्रेसकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांच्यापैकी एकही निवडून येण्याची शक्यता नव्हती; म्हणून भाजपमध्ये असलेल्या चंद्रकांत जाधव यांना पक्षात घेऊन कॉँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असल्याने आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मोठे पाठबळ दिले.

  • दहा वर्षे आमदार म्हणून केलेले काम, विविध आंदोलनांतील आक्रमक सहभाग घेतलेल्या क्षीरसागर यांच्यासमोर जाधव यांचा टिकाव लागेल का, याची धास्ती कॉँग्रेसच्या गोटात होतीच; पण एकदा तिकीट मिळाले म्हटल्यावर उमेदवारी मागणाऱ्यांसह सर्वच नेते, कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रचारात भाग घेतला. जिरवाजिरवीच्या भानगडीत कोणी पडले नाही. एकीकडे कॉँग्रेसमध्ये सकारात्मक विचार आणि जिंकण्याची तयारी सुरू असताना शिवसेनेत मात्र भलतेच घडत होते.
  •  
  • या निवडणुकीत आमदार क्षीरसागर एकीकडे आणि बाकी सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक भलतीकडेच जात होते. मागच्या दोन निवडणुकांत हाच अनुभव क्षीरसागर यांनी घेतला होता. त्यामुळे यावेळी तरी हा दुरावा संपविण्याचा कोणी प्रयत्न करील असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. क्षीरसागर यांनीही सर्व पदाधिकाºयांना दुर्लक्षित केले. त्यामुळे ते विरोधकांच्या छावणीत पोहोचले होते. एवढेच नाही तर त्यांनी उघडपणे कॉँग्रेसचा प्रचार करण्यास सुरुवात केली. अखेर ही गद्दारीच त्यांना नडली.
  •  
  • विरोधक खंडणीबहाद्दर, जुलमी राजकारण, भ्रष्टाचाराचे आरोप करीत असताना त्याचे खंडन करण्यात क्षीरसागर कमी पडले. उलट सर्वसामान्य जनतेवर कोणी अन्याय करीत असेल तर मी सुशिक्षित गुंड व्हायला तयार आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या आक्रमकपणाचे समर्थन केले. हा आक्रमकपणा त्यांना पराभूत करण्यास कारणीभूत ठरला. शिवाजी पेठेतील इंगवले बंधूंमधील वादाचाही त्यांना फटका बसला. जाधव यांनी शेवटच्या क्षणी कॉँग्रेसच्या मैदानावर येऊन विजयी गोल केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक