शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

सीमा भागातील शैक्षणिक संकुलासाठी जागा ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:42 IST

Education Sector Kolhapur : सीमा भाग हा महाराष्ट्राचा भाग असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलासाठी महिनाभरात जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. यावर लवकरात लवकर बांधकाम करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसीमा भागातील शैक्षणिक संकुलासाठी जागा ताब्यात घेणारमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : उदय सामंत

कोल्हापूर : सीमा भाग हा महाराष्ट्राचा भाग असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलासाठी महिनाभरात जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. यावर लवकरात लवकर बांधकाम करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री सामंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सीमा भाग महाराष्ट्राचाच असल्याने तेथील विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने येथे कौशल्य विकासावर आधारित शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाने संस्थेचे नाव ठरवून त्यासाठी भाड्याने जागा घेतली आहे. येथे विविध प्रकारच्या पाच कोर्सेसना मान्यता देण्यात आली असून, अन्य कर्मचारी व पाच प्राध्यापकांची भरतीदेखील करण्यात आली आहे.

दोन महिन्यांपूर्वी या संकुलासाठी शासनाकडून जागा घेण्यावर चर्चा झाली होती. जागेची पाहणी झाली असून, महिनाभरात त्याचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यावर कशा पद्धतीने बांधकाम करायचे याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल.महाविद्यालये बंद होणार हा गैरसमजमंत्री सामंत म्हणाले, सीमा भागातील आर्ट, कॉमर्स, बीएस्सीची महाविद्यालये बंद होणार, असा गैरसमज झाला होता किंवा तो पसरवला गेला असेल; पण शासनाचा असा कोणताही विचार नाही, उलट तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी ३ कोटीशिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी आम्ही ५० लाखांची घोषणा करून १ कोटीपर्यंत निधी देऊ असे जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अध्यासनासाठी ३ कोटी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यापुढचे पाऊल टाकत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून ग. गो. जाधव अध्यासनासाठी ५० लाखांचा निधी दिला आहे. शासनाकडूनदेखील जे ५० लाख देण्यात येणार आहेत, त्या निधीबाबतदेखील पुढील १०-१२ दिवसांत निर्णय होईल.--

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रUday Samantउदय सामंतkolhapurकोल्हापूर