शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा, इशाऱ्यानंतर हटवण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:43 IST

राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भराव हटवण्याचे काम सुरू झाले.

ठळक मुद्देनदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळापाटबंधारेच्या कारवाई इशाऱ्यानंतर बावडा पुलाचा भराव हटवण्याचे काम झाले सुरू

रमेश पाटीलकसबा बावडा: राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. हा भराव त्वरित हटवावा अशी मागणी पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. तरीही ठेकेदार कंपनीने हा भराव काढण्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी या बाबत पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भराव हटवण्याचे काम सुरू झाले.राजाराम बंधारा येथे गेल्या अडीच वर्षांपासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नदीपात्रात भर घालण्यात आली आहे. सध्या बंधाऱ्यातून खालील बाजूस पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे सोडलेले पाणी नदीपात्रात असल्याने भरीमुळे तटून पाण्याला फुगी येत आहे.

या सततच्या फुगीमुळे बंधाऱ्यातील काही मोरीच्या तळातील लोखंडी प्लेटा काढण्यात अडथळा येत आहे. तसेच पुराच्या वेळी पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पुराचे पाणी शहरात घुसण्याची शक्यताही असल्याने हा भराव काढणे गरजेचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे मत आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळवले होते.दरम्यान सध्या पाटबंधारे विभागाला राधानगरी,तुळशी आणि कुंभी या जलाशयामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावयाचा आहे. त्यासाठीही ही भर अडथळा ठरत आहे. ही भर काढून घ्या असे वारंवार सांगूनही संबंधित ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते.

आज याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. बांदिवडेकर, शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास प्रत्यक्ष राजाराम बंधारा येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बंधाऱ्यातील भरावामुळे पाण्याला फुगी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या लोकांना याबाबत कडक शब्दात सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम त्वरित न झाल्यास कारवाई करा अशा सूचना केल्या.या आदेशानंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी, डंपरच्या सहाय्याने हा भराव हटवण्याचे कामास सुरुवात केली. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल. पावसाळ्यानंतर पुलाचे काम जेव्हा परत सुरू होईल, तेव्हा ठेकेदार कंपनीला नदीपात्र पुन्हा भराव घालावा लागणार आहे. 

टॅग्स :riverनदीDamधरणpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर