शेतकऱ्यांशी संवाद साधल्यास उद्देश सफल : मकरंद कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:21+5:302021-09-23T04:26:21+5:30
येथील कृषी सहायक सीमा खारकांडे यांची बदली झाल्याने शहरवासीयांच्यावतीने साधना मंडळाच्या सभागृहात सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ...

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यास उद्देश सफल : मकरंद कुलकर्णी
येथील कृषी सहायक सीमा खारकांडे यांची बदली झाल्याने शहरवासीयांच्यावतीने साधना मंडळाच्या सभागृहात सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात कृषी अधिकारी कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, चंद्रकांत जोंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी नगराध्यक्ष पाटील यांच्याहस्ते कृषी सहायक खरकांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पाटील, चंद्रकांत जोंग, रावसाहेब पाटील, दादासोा पाटील, धनपाल आलासे, जयपाल बलवान, बाळासोा दिवटे, आण्णासोा चौगुले, नगरसेवक उदय डांगे आदींनी मनोगतात कृषी सहायक खारकांडे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
यावेळी जय कडाळे, धोंडीराम चौगुले, विजय भोसले, संदीप गावडे, रावसाहेब उगारे, बंडू उमडाळे, महावीर चिंचवाडे, बाळासाहेब गायकवाड, राजू चौगुले, कल्लाप्पा पोमाजे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. स्वागत रमेश भुजुगडे यांनी केले. साताप्पा बागडी यांनी आभार मानले.
फोटो - २२०९२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे कृषी सहायक सीमा खारकांडे यांचा नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.